केंद्राच्या निधी अभावी घरकुल योजना रखडली…! पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी उघड्यावर…!
केंद्राच्या निधी अभावी घरकुल योजना रखडली…!
पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी उघड्यावर…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :-(राजकिरण द.देशमुख)
सर्वांसाठी घरे, या सकंल्पनेतून पंधप्रधान आवास योजना राबविण्यात आली. मात्र, एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना अद्याप अर्धे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली असून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
कोरोना संकटाने आर्थिक संकट ओढवले. हाताची कामे गेल्याने बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशाही परिस्थितीत गाठीशी असलेला पैसा खर्च करुन घराची कामे पूर्ण केली. काहींची कामे अर्धवट राहिली असून आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र, वर्ष निघून गेले पण हप्ता मिळाला नाही. शासनाकडून घरकुल मंजूर झाल्याने आपली जीर्ण झालेली घरे पाडून आवास योजनेसाठी नवीन घरे बांधायला सुरुवात केली. अनेकांनी किरायाच्या घरी राहून घरकुलाच्या कामाला सुरुवात केली. उसनवारीने पैसे घेऊन अनेकांनी घराचे बांधकाम पूर्णत्वास नेले. पण, आता हप्ते मिळाले नसल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले आहे. एकीकडे घर बांधकामाची चिंता आणि दुसरीकडे घरभाड्याचा भार यामुळे लाभार्थी आता आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. अनेकदा नगर पंचायत कडे विचारणा केल्यावर केंद्राचा निधी आल्याचं नसल्याचे उत्तर मिळत असल्याने नागरिकात तीव्र रोष व्यक्त होत आहे.
माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 847 घरकुलांना मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात 82 घरकुलांना मंजुरी मिळाली होती त्यापैकी 68 लाभार्थ्यांना राज्य सरकार कडून प्राप्त होणारे 40 हजार प्रमाणे दोन हप्ते व केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून 60 हजाराचा एक हप्ता असे 1 लाख 40 हजार रुपये तीन टप्प्यात मिळाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या 265 घरकुल लाभार्थ्यांना पैकी 168 लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून मिळणारे 40 हजारा प्रमाणे दोन हप्ते प्राप्त झाले आहे,मात्र केंद्राचा निधी मिळाला नाही. तर तिसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या 500 लाभार्थ्यांना अद्याप एकही ही हप्ता मिळालेला नसल्यामुळे घरकुलाची कामे रेंगाळली आहे.
@@सहा टप्प्यात मिळतोय निधी@@
योजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासना मिळून २ लाख ५० हजार रुपये लाभार्थ्यांना देतात. त्यामध्ये राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख रुपयांतून पहिल्या टप्प्यात ४० टक्के, दुसऱ्या टप्प्यात ४० टक्के तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के रक्कम दिली जाते. तर केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या दीड लाखांतून पहिल्या टप्प्यात ६० टक्के, दुसऱ्या ६० तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी दिला जातो.अशा एकूण सहा टप्प्यात लाभार्थ्यांला निधी वितरित केला जातो.
–
केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या निधीचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे. पण उर्वरित निधी आलाच नसल्याने आम्ही म्हाडा कडे पाठपुरवा केला आहे. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांना विनाविलंब देण्यात येईल.
वैजनाथ स्वामी
कार्यालयीन अधीक्षक न.पं.माहूर