आमदार ससाने यांनी महागाव तालुक्याला अतिवृष्टि काळात सोडले वाऱ्यावर… हेलिकॉप्टर उडाल्या नंतर आमदार भुर…
रितेश पुरोहत
यवतमाळ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव तालुक्यात 21 व 22 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टि झाली यामधे तालुक्यातील गुंज,शिरपुर,करंजी,चिलगव्हान,खडका,करंजखेड,आनंदनगर,हिवरा,तीवरंग,धनोड़ा,महागाव,फुलसावंगी,कोनदरी,लेवा तसेच अनेक गावात महापुराने थैमान घातले. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शीरले शेतमाल तथा खान्यापिंन्याचे धन धान्य वाहून गेले. अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन चार ते पाच फूट खरडून गेली. जनतेत व शेतकऱ्यांमध्ये या बाबीच्या नुकसानी बद्दल दुःख व्यक्त होत आहे.कधी नव्हे तो मागील 50 वर्षात न झालेला पाऊस यावेळी महागाव तालुक्यात कोसळला त्यामुळे शेतकरी व जनतेचे अतोनात नुकसान झाले परंतु शासन तथा प्रशासन या बाबीकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिल्या जात नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासकीय स्तरावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मदतीची हाक दिली परंतु तालुक्यात तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडून शेतकरी व जनतेच्या नुकसानीचे सर्वे करण्यात आडवणूक होत आहे. खरे तर लोकप्रतिनिधी आमदार खासदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या बाबीकडे विशेष लक्ष घालून तालुक्यातील जनतेसह शेतकऱ्यांना पंचनामे करून तातडीची मदत देण्याची गरज असताना या बाबीकडे विशेष दुर्लक्ष होत आहे. अनेक गावातील शेतमजूर शेतकरी तथा नागरिकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले,त्यांच्या घरामध्ये दैनंदिन उदरनिर्वाहासाठी लागणारे धनधान्य तथा भांडी कुंडी शिल्लक राहिली नाही. तालुक्यात समाजसेवी संस्थांनी आपापल्या परीने होईल तितक्या प्रमाणात मदतीचा हात दिला परंतु तालुक्यात या विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे यांनी कोणत्याही पद्धतीची दखल घेतल्या नसल्याची बाब पूरपीडितांकडून व्यक्त होत आहे.
आमदार साहेब जनतेचा उचलत नाहित फोन
आमदार साहेब अधिवेशनात आहेत जर जनतेने किंवा पत्रकारांनी या संकटात मदती सबंधित फोन केला तर फोन उचलण्यास आमदार साहेब यांना वेळच नाही ही फार या तालुक्यासाठी शोकांतिकाच म्हणावे लागेल. गावागावात जन आक्रोश फैलला आहे परंतु आमदार साहेब अद्यापही तालुक्यातील पूरपीडितांच्या भेटीला आलेच नाही. अधिवेशन हे फार महत्त्वाचे पण मतदारसंघातील जनतेचे या महापुराने होत्याचे नव्हते केले.
शेतकरी मेटाकुटीस आला आहे शेतकऱ्यांच्या शेतात पाच ते सहा फुटांपर्यंत भगदाड पडले पिके वाहून गेली गुरे जनावरे या मध्ये वाहून गेली परंतु आमदार ससाने साहेब यांना या विषयाशी काही देणे घेणे आहे की नाही? हा विषय चर्चिल्या जात आहे अनेक गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आज मीतीस पर्यंत बहुतांश गावांमध्ये पंचनामे झाले नाही. अनेक गावातील नागरिक मदतीची हाक पुकारत आहेत परंतु काही गावातील तलाठी महोदय त्या त्या गावात फिरकलेच नाहीत उदाहरणार्थ काउरवाडी या गावातील विलास भीमराव वळसे तथा प्रकाश भिमराव वळसे यांच्या घरात पाणी शिरले. हे गाव हिवरा तलाठी शेख यांच्याकडे आहे परंतु त्यांनी या गावाला अद्यापही भेट दिली नाही प्रस्तुत प्रतिनिधीने उपविभागीय महसूल अधिकारी व्यंकट राठोड तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दूरध्वनी वरून माहिती दिली परंतु आज मीतीस पर्यंत कोणीही शासकीय प्रतिनिधी या गावात पोहोचलाच नाही. हीच बाब लेवा वाघनाथ करंजखेड धनोडा सह इतर गावांमध्ये हीच परिस्थिती बघावयास मिळते खरे तर लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार नामदेवरावजी ससाने यांची ही खरी जवाबदारी आहे. ज्यांच्या मतदारसंघांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानंतर,त्यांनी प्रत्येक घराचे शेताचे नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत जनतेच्या व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असताना आमदार महोदयाचे याकडे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याची बाब बोलल्या जात आहे.
आनंदनगर येथील 60 ते 70 महिला पुरुष बालक या महापुरामध्ये अडकले होते त्यांना काढण्यासाठी शासकीय स्तरावरून हेलिकॅप्टर बोलवण्यापुरतेच आमदारांचे काम होते का? हा प्रश्न निर्माण होत आहे खरे तर बोलावलेल्या हेलिकॉप्टरने एकही पुरपीडित बाहेर काढले नाही. शेवटी शासकीय स्तरावरील कर्मचाऱ्यांनी बोटीने या नागरिकांना बाहेर सुखरूप काढले परंतु आमदार महोदय महागाव तालुक्याला हेलिकॉप्टर दाखवून स्वतःला धन्य माणित आहेत. खरे तर जेव्हा हेलिकॉप्टर आले आणि परत गेले तोपर्यंत आमदार ससाने साहेब महागाव तालुक्यात हजर होते जसे हेलिकॉप्टर उडाले तसेच आमदार साहेब महागाव तालुक्यातूनही उडून गेले.
आज महापुराला जवळपास तीन दिवस लोटून गेले परंतु गावागावात नुकसानीच्या पंचनाम्याच्या नावाखाली बोंबा उडत आहेत परंतु आमदार साहेबांना या बाबीशी काहीही देणे घेणे नसल्याचे बोलल्या जात आहे. विशेषतः जी NDRF ची टीम आनंद नगर येथील पूरपीडितांना बाहेर काढण्यासाठी आली त्यांनी या पिढीत्यांना महापूरा मधून बाहेरही काढले. त्याच NDRF च्या 25 कर्मचारी व अधिकाऱ्यांना दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत साधे जेवणही मिळाले नाही. हीच का प्रशासनाची समय सूचकता? यांची व्यवस्था गजानन महाराज संस्थान अंबोडा येथे करण्यात आली होती परंतु महागाव तहसीलदार यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले,त्यामुळे या टीमला दुसऱ्या दिवशी सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत साधे जेवणही मिळाले नाही या पलीकडे बोलण्याइतके काही नाही.
विशेषतः या विधानसभेचे आमदार हे महागाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा पालक म्हणून संबोधतात परंतु त्यांनी हेलिकॉप्टर उडून गेल्यानंतर याकडे कोणतेही लक्ष दिले नसल्याची बाब जनतेमध्ये तथा शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तालुक्यातील समस्येबाबत आमदार महोदयांना पत्रकार , जनतेने व शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी बाबत फोन केल्यास आमदार फोनच घेत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. खरे तर ससाने साहेब ज्या पक्षाकडून आमदार झाले, त्या पक्षाला जनसेवा तथा शिस्तीचा पक्ष म्हणून संबोधिल्या जाते परंतु आमदार साहेबांना या बाबीशी काहीही देणे घेणे नसल्याचे चित्र दिसत आहे. केवळ आणि केवळ विकास कामातील मलीधा लाटण्याचा गोरख धंदा असल्याचे पीडीतांकडून बोलल्या जात आहे.