माहूर मध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचा फज्जा; बोटावर मोजण्या इतक्या लोकांची उपस्थिती…!
माहूर मध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचा फज्जा; बोटावर मोजण्या इतक्या लोकांची उपस्थिती…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकीरण देशमुख
माहूर :- प्रशासन लोकाभिमुख व्हावे व तशी ओळख निर्माण व्हावी म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक मंडळात राबविण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे.त्या नुसार आज दिनांक ३० शनिवार रोजी सदरचे महत्वकांक्षी शिबिर माहूर मंडळात जिल्हा परिषदेच्या शाळेत घेण्यात आले. मात्र,या शिबिराची कोणतीच पूर्वकल्पना मंडळातील ग्रामस्थांना नसल्याने कोणीच फिरक ले नाही. केवळ जनजागृती अभावी या शिबिराचा फज्जा उडाला आहे.
जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्यार योजनेचा लाभ तात्काकळ मिळावा यादृष्टीमकोणातून नांदेड जिल्ह्यातील विविध मंडळात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याच्या सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी १९ जानेवारी रोजी सर्व संबंधितांना दिल्या होत्या.त्या नुसार शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत आज शासन आपल्या दारी हे उपक्रम राबविण्यात आले.तालुक्यातील सर्व विभागाच्या योजनेची माहिती व त्या विभागाकडे असलेल्या जनतेच्या प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी तसेच खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी ही संकल्पना या शिबिराच्या मागे होती. मात्र, या कार्यक्रमाची गावात कोणतीच पूर्व कल्पना ग्रामस्थांना नव्हती. इतकेच काय तर लोकप्रतिनिधींना पण या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली नाही. याउलट शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या वीज वितरण कंपनी भारतीय स्टेट बँक मराठवाडा ग्रामीण बँक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक या तिन्ही बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी या उपक्रमाकडे पाठ फिरवली तर पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गैरहजर होते, तालुका कृषी अधिकारी, नगरपंचायत ची मुख्याधिकारी, व इतर काही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ठिकाणी प्रतिनिधी पाठवून शनिवारच्या साप्ताहिक सुट्टीचा मनमुराद आनंद लुटला. याशिवाय विविध विभागाचे चार दोन अशे कर्मचारी मिळून कर्मचाऱ्यांची संख्या पन्नासच्या घरात पोहोचली असली तरी सदर महत्वकांशी उपक्रमाला नागरिकांसह इतर वीस पंचवीस ही लोक उपस्थित नसल्याने सदर उपक्रमाचा पार फज्जा उडाला. शासन परिपत्रक दिनांक ७ सप्टेंबर २० व नांदेड जिल्हाधिकारी यांचे परिपत्रक दिनांक १९ जानेवारी याचा तालुक्यातील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले. केवळ औपचारिकता म्हणून पार पडलेल्या या कार्यक्रमाला माहूर शहराच्या नगराध्यक्षा शीतल जाधव या एकमेव लोकप्रतिनिधी सह सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल सिंह चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस बी भिसे, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आडे, नायब तहसीलदार व्ही. टी. गोविंदवार,नायब तहसीलदार राजेश गिद्दे, कृषी अधिकारी पंचायत अनिल जोंधळे,मंडळ कृषी अधिकारी विनोद कदम, कृषी सहाय्यक आत्माराम थोरे, नगरपंचायत चे सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक सुनील वाघ, जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग विभाग किनवटचे व्ही एल यरोडकर, शाखा अभियंता ए. एच पवार, उप अधीक्षक भूमि अभिलेख विभागाचे बी.बी फुलारी, सहाय्यक निबंधक बी. ए. शिंदे,मंडळ अधिकारी पतकोंडे,तलाठी बी.यु.जगताप, यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पर्यवेक्षिका,यांच्या सह मोजक्या नागरिकांची उपस्थिती होती.
—————-
शासन परिपत्रकानुसार व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचने प्रमाणे कार्यक्रमाला लोकप्रतिनिधीला बोलावणे क्रमप्राप्त असतांना या कार्यक्रमाचे नियोजन असलेल्या तहसील कार्यालयाकडून कुठलीच आम्हाला सुचना देण्यात आली नाही. माहुर मंडळात माझ्या जिल्हा परिषद सर्कलमधील बहुतांशी गावांचा समावेश असल्याने त्या गावाच्या नागरिकांच्या असलेल्या समस्या, प्रलंबित असलेली प्रकरणे आजच्या उपक्रमात निकाली निघू शकली असती, परंतु जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, यांनाच या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने सदर कार्यक्रम हा केवळ औपचारिकता होता असे म्हणावे लागेल.
समाधान जाधव
जि.प.सदस्य वाई बाजार गट
_____________
सर्व संबंधित विभागांना आजच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे पत्र देण्यात आले होते, मात्र काही विभागातील अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर राहिले नाही. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून खुलासा मागणार असून सिंदखेड मंडळातील पुढील कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती असावी अशा सूचना देण्यात येतील.
सिद्धेश्वर वरणगावकर तहसीलदार माहूर