ओबीसींच्या जनगणनेच्या मुद्यावर केंद्र सरकारची फसवणूक
- महासंघाच्या वतीने मुद्यावर मागील पाच वर्षांपासून आंदोलन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर- ब्रिटीशांच्या काळात जात निहाय जनगणना शक्य होती तर आता का नाही? असा प्रश्न उपस्थित करून जनगणनेतून खरी माहिती समोर आल्यास ओबीसींचे राजकीय वर्चस्व वाढेल या भीतीपोटी केंद्र सरकार निर्णय घेत नसून ओबीसींच्या जनगणनेच्या मुद्यावर केंद्र सरकार फसवणूक करीत असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
ओबीसी समाज लोकसंख्येच्या ५४ टक्के आहे. ओबीसींची स्वतंत्र जनगणना होऊन त्यातून खरी माहिती पुढे आल्यास ओबीसींचे राजकीय वर्चस्व वाढेल आणि त्यांच्या मागण्याही वाढतील, या भीतीपोटी केंद्र सरकार हा निर्णय घेत नसल्याची शंका आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ओबीसींच्या जनगणनेचे आश्वासन दिले होते. मात्र, आता केंद्र सरकारने अचानक माघार घेत ओबीसींची फसवणूक केली आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा विचार होऊ शकतो, असेही भुजबळ म्हणाले.
ओबीसी जनगणनेच्या मुद्यावर ओबीसी महासंघ आक्रमक झाला आहे. महासंघाच्या वतीने या मुद्यावर मागील पाच वर्षांपासून आंदोलन सुरु आहे. २०२१ च्या जनगणनेत नोंदणी करताना ओबीसी कॉलम असावा, अशी मागणी महासंघाने सातत्याने केली असून केंद्र सरकारने यासंदर्भात निर्णय न घेतल्यास देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
महागाव भाजपा तालुकाध्यक्षांमुळे उमरखेड विधानसभेत होणार भाजपा उमेदवाराची पीछेहाट ?
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….