आर्णी जवळ एसटी बस – टीप्पर चा भीषण अपघात ; चार मजुर ठार ; १५ गंभीर जखमी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
यवतमाळ / आर्णी :
भल्या पहाटे स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बस चा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आर्णी तालुक्यात कोळवण गावाजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. सोलापूरहून स्थलांतरित मजुरांना घेऊन ही एसटी बस झारखंडला जात होती अशी माहिती समोर आली आहे.
एसटी बसने मागच्या बाजूने टीप्परला जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये एसटीच्या पुढच्या भाग चकानाचुर झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी डंपरच्या फेऱ्या सुरु असतात. या अपघाताने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातच औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची आठवण झाली. औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांचा मृत्यू झाला होता.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….