भाजपतर्फे आजपासून ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यातील विशेषत: मुंबईतील करोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून निष्क्रिय झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केले. महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना भेटून निवेदन देणार आहेत. तर २२ मे रोजी लाखो कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतीलइतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर,कामगार व श्रमिकांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे, ही पक्षाची प्रमुख मागणी आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..