महाविश्वासघाती आघाडी प्रकाश जावडेकर यांची राज्य सरकारवर टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- उद्धव ठाकरे सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली . इतके भ्रष्ट , बेकार आणि संधीसाधू सरकार महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले नाही , अशी टीका माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे . ते आज रविवारी (ता .२८) पत्रकाराशी बोलत होते . जावडेकर पुढे म्हणतात , या सरकारला महाविकास आघाडी म्हटले जाते . मात्र दोन वर्षांतील त्यांचे कर्तृत्व पाहिल्यानंतर लोकांनी तिला महावसूली आघाडी असे नाव ठेवले आहे . मी आज या आघाडीचे महाविश्वासघाती आघाडी असे नामकरण करतो , असा टोला प्रकाश जावडेकर यांनी ( BJP ) लगावला आहे .
महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याची खलबते आताही भाजपकडून सुरु असल्याचे दिसत आहे . सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचा फोटो भाजपकडून शेअर करण्यात आला होता . दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सरकार मार्चमध्ये पडेल असे भाकित वर्तवले होते . मात्र महाविकास आघाडीचे नेते सरकार पाच वर्षे टिकेल अशा त्या भाकिताला उत्तर देत आहेत .