शेतकऱ्यांनो! अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता १५ जूनपर्यंत पेरण्या टाळा : अभय गडम
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची खरीप हंगाम २०२१ मधील शेतीच्या मशागतीची कामे झाली आहेत जिल्ह्यात ९ जून २०२१ पर्यंत ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. काही महसूल मंडळात ७५ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी पेरणी करीत आहे. प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, नागपूर यांनी हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भात १० ते १३ जून दरम्यान वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वारेसुद्धा ताशी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वाहणार आहे. राज्यस्तरावर सुद्धा कृषि विभागाच्या वतीने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी १७ जूनपर्यंत पेरण्या करण्यात येऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी पुढील तीन-चार दिवसात पेरणी केल्यास अतिवृष्टीमुळे पेरणी दडपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे,