ग्रामीण पाणी टंचाई मुळे विहिरी अधिग्रहण करा :- प्रवीण ठाकरे… प्रलंबित देयके अदा करा ; बिडिओंना दिले निवेदन….

ग्रामीण पाणी टंचाई मुळे विहिरी अधिग्रहण करा :- प्रवीण ठाकरे…
प्रलंबित देयके अदा करा ; बिडिओंना दिले निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
उन्हाची चाहूल लागताच ग्रामीण भागात पाणी टंचाई भासू लागली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात पाणी पिण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. पिण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहण करा आणि मागील वर्षी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे प्रलंबित देयके अदा करा अशी मागणी करंजखेड येथील सरपंच प्रवीण सीताराम ठाकरे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मागील वर्षी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुका प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहण केल्या होत्या.परंतु त्यांचे देयके अद्यापही मंजूर करण्यात आले नाही.परिणामी शेतकऱ्यांच्या फरफट झाली.आता पुन्हा उन्हाळा आल्याने ग्रामीण भागात ग्रामस्थांचा घसा कोरडा पडला आहे.मागील अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना देयके मिळाली नसल्याने यावर्षी शेतकरी विहिरी अधिग्रहण करण्यास नकार देत आहे.त्यामुळे मागील वर्षी विहिरी अधिग्रहण करण्यास समोर येत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे .शासनाकडे अधिग्रहण केलेल्या विहिरीचे प्रलंबित देयके देण्यात यावी .आणि नव्याने विहिरी अधिग्रहण करण्याची मागणी करंजखेड येथील सरपंच प्रवीण ठाकरे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..