थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा ; मात्र ठेवली मोठी अट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेची समीकरणे स्पष्ट झाली आहेत. सुपरस्टार विजय यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाने सर्वाधिक 108 जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
काँग्रेसने TVK ला दिलेला पाठिंबा बिनशर्त नसून, त्यासाठी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. एआयसीसी (AICC) प्रभारी गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले की, “ज्या शक्तींचा भारताच्या संविधानावर विश्वास नाही, अशा कोणत्याही सांप्रदायिक शक्तीला या युतीपासून दूर ठेवावे लागेल.” या अटीवरच काँग्रेसचे 5 आमदार विजय यांच्या सरकारला पाठिंबा देतील. ही युती केवळ या सरकारपुरती मर्यादित नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीतही कायम राहील.
राहुल गांधींच्या उपस्थितीत रंगणार सोहळा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विजय यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता, ज्यावर मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तमिळनाडू काँग्रेस कमिटीने पाठिंब्याचा औपचारिक निर्णय घेतला. या बदल्यात काँग्रेसला नव्या मंत्रिमंडळात दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून, गिरीश चोडणकर आणि प्रवीण चक्रवर्ती यासंदर्भात चर्चा करत आहेत.
7 मे रोजी शपथविधी
विजय 7 मे रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. गुरुवारचा मुहूर्त शुभ असल्याने त्याच दिवशी हा सोहळा चेन्नईच्या प्रसिद्ध नेहरू स्टेडियमवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच TVK च्या सर्व आमदारांना चेन्नई सोडून न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तामिळनाडू विधानसभेतील संख्याबळ
TVK – 108 जागा (सर्वात मोठा पक्ष)
DMK – 59 जागा
AIADMK – 47 जागा
काँग्रेस – 5 जागा

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..