आरंभी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस
तालुक्यातील आरंभी येथील एका शेतकरी आणि व्यवसायाने कुंभार असलेल्या एका इसमाने कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आल्याने नुकतीच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
चार महिन्यापासून सततच्या लॉकडाउनमुळे प्रत्येक क्षेत्राला फटका बसला आहे. कित्येक सुक्ष्म, लघु व्यवसाय अडचणीत आले आहे. आरंभी येथील भिमराव रामचंद्र बोरपल्ले(वय ५५ वर्षे)रा.आरंभी,ता.दिग्रस हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचा पिढीजात कुंभाराचा व्यवसाय आहे.विविध प्रकारच्या मातीची भांडी,माठ अन्य साहित्य तयार करून ते गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन विक्री करायचे.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सततच्या लॉकडाऊनमुळे लोकांकडेही पैसे नसल्याने त्यांचा व्यवसाय अडचणीत आला होता. सोबतच शेतीतील नापिकी आणि थकीत कर्ज या अरिष्टामुळे ते चिंतीत असायचे आज सकाळी प्रात विधीला गेले असता शिवारातील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आणखी शेतकऱ्याने आत्महत्या केलीअसून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी करिता ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे आणण्यात आले व पुढील तपास ठाणेदार सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे