BIG BREAKING NEWS दारव्ह्यातील ११ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
गत दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यातील नेर आणि दारव्हा येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत आहे. काल रात्री दारव्हातील ११ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले असून हे सर्व जण सुरवातीच्या पॉझेटिव्ह रुग्णाच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क् काँटॅक्टमधील) आहे. आता जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४३ झाली असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह १९५ वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद जिहाप्रशासनाकडे आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा व मृत्युची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी बाजार किंवा इतरांच्या संपर्कात येणे टाळावे. अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच साबणाने स्वच्छ हात धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा. ज्या नागरिकांना श्वसनाचा त्रास, १०० अंशापेक्षा जास्त ताप, नियमित खोकला असेल त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नजीकच्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड हॉस्पीटलमध्ये तात्काळ दाखल व्हावे. तसेच याबाबत खाजगी रुग्णालयात वेळ न घालवता ग्रामस्तरावरील किंवा तालुकास्तरावरील शासकीय यंत्रणेसोबत संपर्क करून शासकीय रुग्णालयात भरती व्हावे. वरील लक्षणे असल्यास कोणत्याही नागरिकाने स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करू नये.
जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यापैकी चार रुग्ण अगदी शेवटच्या क्षणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. तसेच दोन जण वैद्यकीय महाविद्यालयात आणत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला. त्यामुळे नागरिकांनी खाजगी रुग्णालयात कोणताही वेळ न घालवता कोव्हीड रुग्णालयात भरती व्हावे. जेणेकरून त्यांच्यावर वेळेवर उपचार करता येतील. वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांचा जीव वाचवित आहे. यात आतापर्यंत तीन रुग्णांना मृत्युच्या दाढेतून काढून डॉक्टरांनी त्यांना बरे केले आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या नागरिकांनी वेळेत भरती होऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना उपचाराची संधी द्यावी.
तसेच कोरोना ही एक संधी मानून नागरिकांनीसुध्दा यापुढे आपली जीवनशैली बदलविणे गरजेचे आहे. शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल तर आपल्या घरीच नियमित 30 मिनिटे व्यायाम, योगा करा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.