चुकीच्या पासच्या आधारे ‘त्या’ कोरोणा पॉझिटीव्ह व्यक्तीचा परिवारासह मुंबई-दारव्हा प्रवास
जिल्हा बंदी नाक्यावर पकडण्यात प्रशासनाला यश; सतर्कतेमुळे अनर्थ टळला
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
आपल्या भावाच्या मृत्युने हादरल्याने मुंबई वरुन खोट्या पासच्या आधारावर मुंबई ते दारव्हा प्रवास करणार्या ‘त्या’ कोरोणा पॉझिटीव्ह रुग्णावर तहसीलदार जाधव यांच्या तक्रारी वरुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारव्हा येथील रहिवासी असलेला व कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक झालेल्या ‘त्या’ व्यक्ती चा भाऊ आजारी पडला व उपचारा दरम्यान त्यात त्याचा मृत्यू झाल्याने डाॅक्टरांना संशय आल्याने त्याची कोरोणा ची टेस्ट केली व त्यात त्याची रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आपल्या भावाच्या मृत्यु ने हादरलेल्या ‘त्या’ व्यक्तीने आई, पत्नी व दोन मुला सह भाड्याच्या वाहनाने खोट्या पासच्या आधारावर मुंबई ते दारव्हा चा रस्ता धरला. मात्र प्रशासनाला आधीच यांची खबर असल्याने ते अलर्ट असल्याने शनिवारी त्यांचे वाहन सावंगी रेल्वे येथील जिल्हा बंदी नाक्यावर पकडण्यात आले. तेथुन पोलिस बंदोबस्तात त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले व रुग्णालयात अॅडमीट करुन त्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात तो व्यक्ती कोरोणा पॉझिटीव्ह आढळून आल्याने दारव्हा येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाली आहे. रविवारी रात्री त्या रुग्णाला तातडीने यवतमाळ येथे पाठवण्यात आले असून त्याच्या कुटूंब व वाहन चालकासह पाच जनांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. प्रशासनाला त्या कोरोणा पॉझिटीव्ह रुग्णाच्या भावाचा अहवाल आधीच प्राप्त झाल्याने जिल्हा बंदी नाक्यावर त्यांना अडवून दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याने प्रशासनाच्या सतर्कतेमुळेच कोरोणा संसर्गाचा धोका टळला असल्याचे बोलल्या जात
‘ई-पास’ चुकीची
त्या कुटुंबाने मुंबई ते यवतमाळ अशी ई-पास मुंबईत काढायला पाहिजे होती. ती न काढता यवतमाळ येथून काढलेली चुकीची “ई-पास’ त्यांच्याकडे आढळून आली. ‘ई-पास’मध्ये नमूद असलेल्या वाहनाशिवाय दुसऱ्याचे वाहनाने त्यांनी प्रवास केल्याचे आढळून आले. शिवाय एकाच गाडीत ड्रायव्हरसह सात व्यक्ती असल्यामुळे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन केले. त्यामुळे त्या वाहनातून प्रवास करणाऱ्या सर्वच व्यक्तींवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
-मनोज केदारे,ठाणेदार, पोलिस स्टेशन, दारव्हा.