“पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी नाही” ; आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात बैठक घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर थेट टीका करणे टाळले. युवा नेत्यांना बळ देऊ शकलो, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
“पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी करण्याची गरज नाही. त्यांची काळजी करण्यापेक्षा आपण नागरिकांचे प्रश्न हाती घेऊन ते सोडवले पाहिजेत. जर आम्ही आमच्या युवा नेत्यांना बळ देऊ शकलो, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल. त्यामुळे आपण कामाला लागावे आणि आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मला खात्री आहे की आपण हे करू शकलो तर, आम्ही तरुण नेते उदयास येताना पाहणार आहोत,” असे शरद पवार म्हणाले.
आगामी निवडणुकीत पवार विरुद्ध पवार, असा संघर्ष पाहायाला मिळणार आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये बारामतीचा देखील सहभाग आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष आहे.
अजित पवारांसह अनेक आमदारांनी साथ सोडल्यामुळे शरद पवार आता नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे ही शरद पवार गटाची जमेची बाजू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज पुण्यात झालेल्या बैठकीत देखील नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….