पवित्र रमजान महिना संपेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य बाजार पेठ बंद ठेवण्यात यावी.
मुस्लिम समाज बांधवांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
पॉलिटिक्स स्पेशल
अब्दुल रहेमान चव्हाण : ९६५७१७६१४८
पुसद :
संपूर्ण देशात मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिना ला सुरुवात झाली असून मुस्लिम समाज बांधव या पवित्र रमजान महिन्यात नियमित रोजा (उपवास) एक महिना भर ठेवतात.तसेच या पवित्र महिन्यात महिन्यात गोर गरीब नागरिकांना कमावलेल्या संपत्तीतून,फित्रा, जकात म्हणून धान्य वाटप करण्यात येते.या सह अन्य पवित्र रमजान महिण्यात नियमित लोकांना सुख-समृद्धी मिळावे म्हणून काटे कोर पणे नमाज अदा करतात .सर्वत्र हर्ष उल्हासात पवित्र रमजान महिना व ईद ही साजरी केल्या जाते. या वेळी देशात कोविंड -१९ या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असून सर्वत्र लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन पुसद विभागातील मुस्लिम समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. ते आपल्या निवेदनात म्हणतात की, महाराष्ट्रात कोरोना या जीवघेणे आजाराने थैमान घातले असून कोरोना रुग्णांचीदिवसेंदिवस संख्येचा आलेख वाढत चालला आहे.त्यामुळे महाभयंकर रोगाचे महाराष्ट्रावर संकट आहे.अशा परिस्थितीत रमजान ईद पाहता शहरातील मुख्य बाजारपेठ खुली केली तर सोशल डिस्टन्सइन यांचे उल्लंघन होऊन रुग्णाच्या प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शहरातील मुख्य बाजारपेठेत किराणा व जीवनावश्यक वस्तु च्या दुकाने सोडून सर्व दुकान लाईन बंद, ठेवण्यात यावे. अशी मागणी मुस्लिम समाज बांधव यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या सह संबंधित सर्व विभाग व मंत्री यांना प्रतिलिपी देण्यात आले आहे.
निवेदनावर एम.आय.एम शहराध्यक्ष सय्यद सिद्दिकोद्दीन , एम.आय.एम युवक तालुकाध्यक्ष फिरोज खान , सय्यद जहिरोद्दीन , मोहम्मद जिब्रान , राजू चंदनकर , शिवकुमार दीक्षित , अब्दुल रहेमान चव्हाण , सय्यद मोहीन अली , हकीम चव्हाण , कादर खान , सय्यद आसिमोद्दिन यांच्या सह अन्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.