पेढी – पोखरी परिसरात खुलेआम मटका , गुटखा, दारूची विक्री ; सर्वाधिक अवैध व्यवसायाचा केंद्र ; बीट जमादाराचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ; बीट जमादाराला निलंबित करण्याची नागरिकांची मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
तालुक्यात अंशतः बंद झालेले अवैध व्यवसाय पुन्हा फोफावले आहेत.पेढी पोखरी परिसरात अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.याच क्षेत्रात वेगवेगळे व्यवसाय सुरू झाल्याने नागरिकांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.मटका ,गुटखा आणि अवैध दारूची विक्री सर्वाधिक वाढली आहे.मात्र याकडे स्थानिक बीट जमादार यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले.तर स्थानिक पोलीस प्रशासनाने यावर मुकसंमती साधली आहे.

एकीकडे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ अवैध व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासाठी पुढाकार घेत असताना पेढी -पोखरी परिसरात अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे. बीट जमादार यांच्या अर्थपूर्ण मधुर संबंधाने अवैध व्यावसायिकांना ,व्यवसाय चालू राहण्यासाठी आर्शिवाद देत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या सूचनांना संबंधित बीट जमादाराने घरचा आहेर देत असल्याने चर्चेला उधान आले आहे.

संवेदनशिल क्षेत्र म्हणुन पोलीस दप्तरी नोंद असलेल्या पेढी – पोखरी शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढल्याने दारूची मिकळत सहज होत आहेत.दारूच्या आहारी असलेल्या बेवड्यांच्या सहाऱ्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.पोलीस निरीक्षकाचे बीट जमादार यांच्याशी आर्थिक साटेलोटे करून अवैध व्यवसायिकांना जणू काही परवाना देण्यात आल्याचे सध्यस्थितीत पेढी – पोखरी परिसरात चित्र आहे.
सुरू असलेल्या अवैध मटका , जुगार ,गुटखा आणि दारूच्या व्यवसायाने नागरिकांनी संबंधित बीट जमादार आणि पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त आहे.त्यामूळे दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….