महाराष्ट्रासाठी इशारा ; दोन दिवसात 40 डिग्रीच्या पुढे जाणार तापमान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रति चक्रीवादळ अजूनही कायम आहे. ज्या ठिकाणी हे चक्रीवादळ तयार झाले आहे, तेथील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
त्यामुळे गुजरातमधून येणार्या उष्ण वार्यांमुळे संपूर्ण मध्य प्रदेशात कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रातील सौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि राजस्थान तसेच किनारी कर्नाटकासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्यात दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi NCR) तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी, दिवसभर कडक सूर्यप्रकाश (SunLight) असेल, तापमान 34 अंशांपर्यंत जाऊ शकते. शनिवारपर्यंत तापमान कमाल 36 तर किमान 18 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने कधीही उष्णतेची लाट येऊ शकते. 15 आणि 16 मार्च रोजी मुंबईसह ठाणे (Thane), रायगड (Raigad), पालघर (Palghar), सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने अलर्ट (IMD Alert) जारी केला आहे. (Weather Update)
या दोन दिवसांत गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी 15 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर 16 मार्च रोजी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. दोन्ही दिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट राहील.
—
राजधानी दिल्लीत वाढणार तापमान
देशाची राजधानी दिल्लीचे तापमान 33 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
येत्या दोन दिवसांत त्यात आणखी वाढ होईल. कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होणार आहे.
सोमवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ते सामान्यपेक्षा 4 अंश सेल्सिअस जास्त आहे.
किमान तापमान 17 अंश सेल्सिअसवर पोहोचले.
हे सर्वसामान्य प्रमाणापेक्षा एक अंश सेल्सिअस जास्त आहे.
हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 37 ते 94 टक्के राहील. मंगळवारी आकाश निरभ्र असेल.
उष्णता अधिक तीव्र होईल. कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहील.

महाराष्ट्र एकवटणार..! राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली; दोन ऐवजी एकच मोर्चा, शिवसेनेला चर्चेसाठी प्रस्ताव….
इंदिरा गांधींजी असत्या तर त्यांनी पाकिस्तानचे 4 तुकडे केले असते, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या….
पुसदच्या मुस्लिम बांधवांनी लाईट बंद करून ‘वक्फ कायदा 2025’ चा शांततेच्या मार्गाने केला विरोध ; संपुर्ण पुसद शहरातील मुस्लिम समाजाचा लाईट बंद आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग….
महागाव येथे सत्यपाल महाराज यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; महागाव तालुका पत्रकार संघाच्यावतीने विविध मान्यवरांचा पुरस्काराने केला जाणार सन्मान….
दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग…!
बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….