“मुख्यमंत्री पद भाजपाला मिळणार म्हणून गद्दारी केली” ; राणेंचा सेनेवर जोरदार घणाघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक 01 मार्च :- ‘आता खुर्ची हलायला लागली आहे,आम्ही आहोतच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून शिवसेना निवडून आली. पण मुख्यमंत्रिपद भाजपला मिळतंय म्हणून गद्दारी केली’, अशी जळजळीत टीका भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे नाशिकमध्ये दाखल झाले आहे. IT कोंनक्लेव्ह 2022 चं उद्घाटन राणेंच्या हस्ते पार पडलं. नाशिक शहरात IT पार्क सुरू करण्यात येणार आहे, आडगाव शिवारात 335 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानपानाचे नाट्य पाहण्यास मिळाले होते.
महापौर सतीश कुलकर्णी,माजी मंत्री जयकुमार रावळ यासह आमदार देवयानी फरांदे यांनी हजेरी लावली. पण या कार्यक्रमात आयोजक असूनही पालिका प्रशासनाची अनुपस्थिती होती. पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यावेळी बोलत असताना नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
‘कोकणात नाणार भागातील सर्व जमिनी शिवसेना नेत्यांच्या आहेत. अणुऊर्जा प्रकल्पात या जमिनी देतील आणि पैसे कमावतील. नुसत्या घोषणा देतात,काही दम नाही यांच्यात. मी उभा राहिलो आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं मोजणी करून घेतली.
जिथे तिथे विरोध तिथे विरोध करत आहेत. नाशकात मी येणार म्हणून विरोध केला मात्र, एकही शिवसैनिक समोर येत नाही, विरोध विकासाला नको. तामिळनाडू, गुजरात, केरळ,उत्तरप्रदेश पुढं चाललंय, महाराष्ट्र मागे पडतोय, अशी टीका राणेंनी सेनेवर केली. 1991 पासून मला प्रोटेक्शन आहे, मी कुणाला घाबरत नाही.
पेपर कटरनं हल्ला केला बदला म्हणून नितेशवर हल्ला केला. पण आता खुर्ची हलायला लागली आहे,आम्ही आहोतच. भाजपसोबत युती करून शिवसेना निवडून आली. पण मुख्यमंत्रिपद भाजपला मिळतंय म्हणून गद्दारी केली.
पंतप्रधानांवर आरोप करायची लायकी नाही,पात्रता नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही, अशी टीका राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली. ‘राज्य प्रगतीवर बोला,विकास,शिक्षण हे विषय नाहीमुंबईत मराठी माणसांची घरं गेली, तिथे झालेल्या इमारतीत हे पार्टनर आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री ही पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे आहे. अनेक मंत्री जेलमध्ये जायच्या वाटेवर आहे.
मुंबई पालिकेच्या स्थायी समिती चेअरमन मोजणी 100 कोटीच्या वर चालली आहे, असा टोलाही राणेंनी लगावला. ‘नाशकात IT पार्कचा हा प्रस्ताव 1 महिन्यांपूर्वी आला. नाशकात राजकारण जास्त खेळलं जातंय. आपल्याला राजकारण खेळायचं नाही तर IT पार्क उभं करायचंय.
मात्र,उद्योग कष्टातून उभा राहतोय. आत्मनिर्भर होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. कमिशनर (पालिका आयुक्त) पळून गेले. मी केंद्रीय मंत्री,कार्यक्रमात असतांना आयुक्तांनी यायलाच हवं होतं, अशी टीकाही राणेंनी केली.
‘युक्रेनहुन आलेल्या विद्यार्थ्यांचं आज मुंबईत स्वागत केलं. अत्यंत भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. तिथलं परिस्थिती भीषण आहे. आपण युद्ध थांबवू शकत नाही. आपल्याला ज्यांना वाचवता येईल त्या सगळ्यांना आपण वाचवणार, सुखरूप परत आणणार’, अशी ग्वाही राणेंनी दिली.