एका हिंदुत्ववाद्याने गांधीजींना गोळी मारली होती ; महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्वीट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- आज महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी आहे. या दिवशी राहुल गांधी यांच्य ट्विटमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. एका हिंदुत्ववाद्याने गांधीजींना गोळी मारली होती असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
तसेच सर्व हिंदुत्ववाद्यांना वाटतं की गांधी सध्या हयात नाही, परंतु जिथे सत्य आहे तिथे आजही बापू जिवंत आहेत असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ज्यांचा हिंदुत्ववादावर विश्वास आहे ते कुणाच्याही समोर झुकतात अशी टीका राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात केली होती. ज्यांच्या हिंदुत्वावर विश्वास आहे ते इंग्रजांसमोर झुकायचे आणि ते पैश्यांसाठी झुकायचे, अशी राहुल गांधी म्हणाले होते.

वरिष्ठ नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
भारतीय स्वातंत्र्य लढ्याती अग्रगण्य नेते मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांना नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ रोजी गोळ्या घालून ठार केले होते. सध्या संपूर्ण देश त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना श्रध्दांजली वाहत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रध्दांजली वाहिली आहे.
सुभाष चंद्र बोस यांनी म्हटले होते राष्ट्रपिता
नेताजी सुभाषाचंद्र बोस यांनी ६ जुलै १९४४ रोजी रंगून रेडियो वरून एक भाषण दिले होते. तेव्हा नेताजी यांनी बापूंचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. नेताजी यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करताना महात्मा गांधी यांचा आशिर्वाद मागितला होता. बोस यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, आमचे राष्ट्र्पिता भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपला आशिर्वाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

महात्मा गांधी
गांधी दक्षिण आफ्रिकेहून इंग्लंडमार्गे ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस कायमचे भारतात परत आले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी, भारतात गेल्यावर एक वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या, असे त्यांना सांगितले होते. मुंबई, मद्रास इ. शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधींनी हरद्वारचे गुरुकुल व शांतिनिकेतन यांस भेटी दिल्या. हरद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. त्यानंतर अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….