काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. खा. श्री. मल्लिकार्जुन खरगेजी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. खा. श्री. राहुलजी गांधी,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे कार्य व काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण भरीव कार्य कराल व काँग्रेस पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल, हा विश्वास आहे.
शहरातील राजकीय व सामाजिक घडामोडींना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शहराध्यक्षांनी सोशल मीडिया पदासाठी नवीन नियुक्ती जाहीर केली आहे. या पदावर सादात पठाण यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या डिजिटल उपस्थितीत अधिक बळकटी येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सादात पठाण यांनी यापूर्वी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून सोशल मीडिया व्यवस्थापनाचा त्यांना चांगला अनुभव आहे. ते माजी प्रदेश सचिव युवक चे पण होते त्यांच्या या अनुभवाचा उपयोग करून शहरातील विविध विकासकामे, उपक्रम व जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे.
शहराध्यक्षांनी सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे जनतेपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडणे व नागरिकांच्या समस्यांवर त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.”
नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीबद्दल आभार व्यक्त करताना सांगितले की, “माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाची व शहराची प्रतिमा अधिक उंचावण्याचा मी प्रयत्न करेन.”
या नियुक्तीमुळे शहरातील राजकीय व सामाजिक माहिती अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे नागरिकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..