आवास योजनांच्या कामात गती द्यावी ; प्रत्येक गरजू व्यक्तींना घर मिळवून द्या :- बच्चू कडू यांनी दिले निर्देश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्यमंत्री कडू यांनी दिले.चांदूर बाजार शहरातील विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.
दरम्यान यावेळी अमृत योजना पाणीपुरवठा, रमाई आवास योजना, शहरातील घनकचरा व्यवस्थापन नगरोत्थान योजना आदी विविध योजनांच्या कामांचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला.तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह नगरपरिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.
पुढे बच्चू कडू यांनी शहरात सुनियोजनबद्ध विकास कामे राबवावीत,तसेच आवास योजनांच्या कामांना गती द्यावी आणि प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.दरम्यान प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत.