आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन
पॉलिटिक्स पेशल लाईव्ह
पुसद
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांचा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून गौरव केला जातो. नाईक साहेबांनी महाराष्ट्राचे नेतृत्व अकरा वर्षाहून अधिक काळ केले. महाराष्ट्र राज्याला राजकीय स्थैर्य मिळवून दिले त्यामुळे शेती व सहकार क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडी मिळवता आली याला शुगर लॉबी असे नामाभिधान दिले आहे .या शुगर लॉबीची निर्मिती नाईक साहेबांचे काळात झाली. तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते पाटील यांनी सहकार क्षेत्राची संकल्पना मांडली होती. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कृषी औद्योगिक प्रकल्प उभारण्यात आले. कृषी-औद्योगिक प्रकल्पाची उभारणी झाल्यामुळे विशेषत: दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट झाला.विदर्भ- मराठवाड्यातही कृषी-औद्योगिक प्रकल्पाची उभारणी नाईक साहेबांनी केली परंतु विदर्भात पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे सहकार क्षेत्राची प्रगती होऊ शकली नाही.
महाराष्ट्राला रोजगार हमी योजना, एकाधिकार कापूस खरेदी योजना, शासकीय धान्य खरेदी योजना अशा योजना राबवून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला अशा या महानायकांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पॉलिटिक्स स्पेशल चे विनम्र अभिवादन.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….