माहूरगड येथील श्रीरेणूकामाता मंदिराच्या पायथ्याशी भिषण आग ; नगर पंचायतीचे अग्निशमन पथक वेळेत पोचल्याने पुढील अनर्थ टळला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकिरण देशमुख
माहूर :- साडेतीन शक्तीपीठापैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूर गडाच्या पायथ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून पातळखण, ओटी, विडा प्रसाद विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची ११० दुकाने असून मंदीराच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल असल्याने उन्हाळ्यात पानझड होउन उन्हाने सुकलेल्या पानामूळे दरवर्षी वनवा लागल्याने आग लागून वनसंपत्तीसह वन्य प्राण्यांंचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते,दिनांक १मार्च २०२२ रोजी रात्री ८ वाजताचे दरम्यान वनवा लागल्याने मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दुकानाच्या मागील बाजूस आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले होते. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून नगरपंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांना दिली.त्या नंतर काही वेळात अग्निशमन वाहनांसह पथक घटनास्थळी दाखल झाले नगर पंचायतीच्या पथकासह कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन वाहनाचे चालक अविनाश रुणवाल, स्वच्छतादूत गणेश जाधव, विजय शिंदे, जोतिबा खडसे, प्रविण शेंडे, यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, न.पं.काँग्रेस गटनेते विलास भंडारे, राजू सौंदलकर, रेणुकादेवी व्यापारी असोसिएशनचे सचिव संजय आराध्ये,रणधीर पाटील, तानूभाई, शेख नबी साहब यांनी घटनास्थळी भेट दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..