अजित पवारांचा शेतकऱ्यांना सरकारला न लुटण्याची सल्ला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती :- बारामतीतील माळेगाव येथे सोमवारी राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सरकार तुमचेच आहे, पण सरकारला लुटू नका असा सल्ला दिला.
अजित पवार यांनी रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावर बोलताना हे भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हटले की, लोकांनी रस्ता रुंदीकरणामध्ये रस्त्याच्या बाजूला झाडे लावली आहेत. जो जमिनीचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे. त्याच ठिकाणी लोकांनी झाडे लावली आहेत. दुसऱ्या बाजूला झाडे लावली नसल्याचे दिसून आले. यावर प्रांतधिकारी यांना विचारले, तर त्यांनी आंबा, नारळ याची झाडे लावली की जास्त पैसे मिळतात. त्यामुळे लोक अशी झाडे लावतात असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी सरकार पण तुमचेच आहे, सरकारला लुटू नका शेतकऱ्यांना सल्ला दिला.
दरम्यान पाच, सहा आणि सात हजार रुपयांची पगार वाढ एसटी कर्मचाऱ्यांना दिली आहे. विलनीकरणाबाबत समिती नेमली आहे. शाळा सुरू झाल्या आहेत, सर्व सामान्य एसटी सेवेपासून लोकांना वंचित राहावे लागत असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले. एसटी कर्मचारीदेखील आपलेच आहेत. पण हे विलनीकरण करा असे सांगता येत नाही. तुम्ही एसटी सुरू करावी, अशी विनंतीही अजित पवार यांनी संपकऱ्यांना केली आहे.
सीएनजी किट असलेल्या ट्रॅक्टरचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, सीएनजी किटमध्ये 10 किलो गॅसची क्षमता आहे. सीएनजीमुळे 4 ते 4.5 किमी एवढा मायलेज देतो. त्यामुळे इंधनाची 40 टक्के बचत होणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. पण, माझ्या ट्रॅक्टरला सीएनजी बसवले नसल्यामुळे याबाबतची मला माहीत नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.