“बाजार में जाओ मिठाई खाओ” राज्यपालाकडून ठाकरे सरकार वर टिका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा कलगीतुरा याआधी अनेकदा बघायला मिळाला आहे.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते.
त्यानंतर आज संत ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभात ते उपस्थित राहिले होते. नुकतंच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. यावर विचारले असता राज्यपालांनी बाजार मे जाओ मिठाई खाओ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.
राज्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा कलगीतुरा याआधी अनेकदा बघायला मिळाला आहे. राज्यपालांचा लेटरबॉम्ब, त्यावर मुख्यमंत्र्यांकडून पत्रातून उत्तर असे घडले होते. शिवाय सत्ता स्थापनेवेळी राज्यपालांच्या भूमिकेवरसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली होती. दरम्यान, आता भगतसिंह कोश्यारी यांनी दोन वेळा बाजार मे जाओ मिठाई खाओ असा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.