रब्बी हंगामासाठी अधर पुस प्रकल्पाचे पाणी सोडणार ; राष्ट्रवादी चे युवा उपसरपंच गुणवंत राठोड यांच्या प्रयत्नांना यश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
रब्बी हंगामात सिंचन करण्यासाठी अधर पुस प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती.
रब्बी हंगामाला सुरुवात झाली असुन शेतामध्ये गहू,चना,भुईमूग या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असुन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या अधर पुस प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्यात यावे त्यामुळे या कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या वेणी, सवना,अंबोडा, शिरपुर, खडका,लेवा,बारभाई(तांडा),राऊतवाडी,हिवरा,ईजनी,पोहंडुळ, तिवरंग,चिखली,वाकान,मलकापुर या गावांमधील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असुन तत्काळ या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता महागाव यांना देण्यात आले होते.
युवा कार्यसम्राट आमदार इंद्रनीलभाऊ नाईक साहेब यांच्या पाठपुराव्याने निवेदनाची दखल घेऊन मागणीला यश मिळाले.