शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सरकारच्या विरोधात भाजपाचे आज अभिनव आंदोलन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक गेले.मात्र या नुकसानीची भरपाई देण्यासाठी महविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार असल्याने भाजपा शेतकऱ्यांच्या हितार्थ मैदानात उतरली आहे.शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आणि मूकबधिर महाविकास सरकारच्या विरोधात भाजपाचे आज (ता.२)अभिनव आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी दिवाळी म्हणून शासनाला जागे करण्यासाठी तहसील कार्यालयात शिदोरी आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकरी संकटात असताना सरकारकडून कवडिची मदत मिळाली नाही , उलट शेतकऱ्यांची विज तोडणी करण्यात येत आहे.निराधारांना दिवाळी पूर्वी मानधन देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. अपंग, आणि विधवा महिलांना मागील चार महिन्यांपासून अनुदान नाही.हे राज्य सरकार मूकबधिरांचे सोंग घेत असल्याचं आरोप भाजपा कडून करण्यात आला आहे.
.त्यामुळे भाजपा आता शेतकरी , अपंग, निराधारांच्या समर्थनात आंदोलनाच्या पवित्र्यात उतरली असून आज भाजपा कडून अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे.त्यामध्ये तहसील कार्यालयात भाजपा कार्यकर्ते आणि शेतकरी शिदोरी आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष दीपक आडे यांनी बोलताना सांगितले . या आंदोलनात विद्यमान आमदार नामदेव ससाणे ,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा , माजी आमदार राजेंद्र नजरधने , उत्तमराव इंगळे , यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.यावेळी सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.