तत्कालीन तहसिलदारांवर कारवाई होणार काय ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुठमाती…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे :- ९३७०४६४८२४
दिग्रस :-
मागील तिन वर्षापासून तत्कालीन तहसीलदार किशोर बागडे, राजेश वजिरे यांचा कामचुकारपणामुळे शेकडो ब्रास रेती साठ्याच्या तक्रारीची चौकशी करून तलाठी व नायब तहसीलदार यांनी स्थळ पंचनामा 21/5/2019 रोजी करून त्यात श्रीराम स्कुल च्या संस्थेच्या बांधकामासाठी ठिय्या केल्याची बाब नमूद असून या चौकशीत रेतीची बोगस रॉयल्टी सादर करून संबंधिताची कोणतेही रॉयल्टी नसून चंद्रपूर गोंदिया तसेच यवतमाळ येथील जिल्ह्याच्या रॉयलटी तपासणी करीता तत्कालीन तहसीलदाराने पाठविल्या असून त्याचे अहवाल सुद्धा येऊनही कारवाईचा देखावा करून कार्यवाहीवर अंतिम शिक्कामोर्तब न केल्याने होणाऱ्या कार्यवाहीने महसुलात वाढ होण्या ऐवजी तत्कालीन तहसीलदारांनी आपले कर्तव्याला बगल देत महसूल कायद्याची ऐसी तैसी केली. रेती साठे बाजाची पाठराखण करून महसूल ढिडवडे उडवून लाखोंचा महसूल बुडविण्यासाठी अधिकारीच जबाबदार असल्याने या प्रकरणातील रीतसर तक्रार विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य सचिव आपले सरकार या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली यामध्ये तत्कालीन तहसीलदारांनी या सर्व वरिष्ठांच्या पत्रव्यवहार आला कचरा कुंडीच्या जागेवर ठेवून महसुलात वाढ करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी स्वतःच्या महसुलात वाढ करण्याची कोणतीही संधी सोडली नाही त्यामुळे या प्रकरणी चैक्षीच करून अहवाल सादर करण्यात यावे असे आदेश वरीष्ठचे आदेश असतानाही मूक गिळून प्रकरणात कार्यवाही केल्याचा देखावा करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ठेवण्याची कुन कुन महसूल मधेच होत आहे मात्र अंतिम शिक्कामोर्तब फक्त बाकी असल्याने अखेर तत्कालीन दोन तहसीलदारांच्याअंतिम शिक्कामोर्तब न केल्याने लाखोचा महसूल बुडाला असून या प्रकरणाचा अंतिम शिक्कामोर्तब झाल्यास महसूल विभागाला लाखोंचा महसूल मिळणार असल्याने या कार्यवाहीत कोणत्या अंतिम शिक्कामोर्तब केले नसल्याने आपल्या कर्तव्यआला बगल देऊन दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कार्यवाही जिल्हा अधिकारी करतील काय ? अन्यथा तत्कालीन तहसीलदारांची पाठराखण करून ज्या महसुल खात्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर झटकून टाकणार ह्याकडे लक्ष लागले आहे…