माहूर गडावर खाजगी वाहनाला बंदी ; 250 पोलिसांवर असणार सुरक्षा व्यवस्था ; श्रीक्षेत्र माहूर गडावरील नवरात्र उत्सव…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :-
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवी मंदिर संस्थान येथे शारदीय नवरातरौत्सव दरम्यान गडावर खाजगी वाहनाला बंदी असल्याने राज्य परिवहन विभागाने 80 बसेच ची व्यवस्था केली आहे.तर 250 पोलिसांवर भाविकांची सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
आज दि.4 सोमवार रोजी दुपारी एक वाजता माहूर येथील तहसील कार्यालयात सहा. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्था संदर्भात यात्रा नियोजन बैठक घेण्यात आली.या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव व पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी नवरात्र उत्सव यात्रा काळात 200 होमगार्ड व इतर आवश्यक पोलीस अधिकारी,कर्मचारी यात्रा काळात अतिरिक्त बंदोबस्तासाठी असणार असल्याची माहिती देत मंदिर रात्री उशिरा पर्यंत सुरू असणार असल्याने वीज वितरण कंपनी ने अखंडित सेवा पुरवावी असे सांगितले तर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व्हीं.एन.भोसले यांनी यात्राकाळात वीस बेडचे संपूर्ण वार्ड, आपत्कालीन सेवेसाठी 3 रुग्ण वाहिका आरक्षित करण्यात आल्या असून आवश्यक औषध गोळ्याचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले.24 तास सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी अतिरिक्त ट्रान्स्फर ची व्यवस्था व काळापाणी तलावाजवळ थ्री फेस वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे महावितरण कंपनी चे कनिष्ठ अभियंता पंकज रापतवार यांनी सांगितले.
श्री रेणुकादेवी ते दत्तशिखर -अनुसया माता मार्गाची डागडुजी करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रवींद्र उमाळे यांनी सांगितले.नगर पंचायत कडून पार्किंग च्या ठिकाणी पाण्याचे टँकर,फिरते स्वच्छालय,नियंत्रण कक्ष,व मातृतीर्थ तलाव येथे जीव रक्षक दल ची व्यवस्था करण्यात आल्याचे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांनी सांगितले आहे. यात्रेचा महत्त्वाचा दुवा असलेल्या राज्य परिवहन महामंडळ यांच्या कडून यात्रा काळात ८० बसेस ची व्यवस्था करण्यात आली असून रेणुका देवी, पार्किंगच्या ठिकाणावरून व टी पॉइंट असे तीन थांबे भाविकांच्या गडावर ने आन करण्यासाठी नियोजित केल्याचे आगारप्रमुख व्ही.टी. धुतमल यांनी सांगितले.बैठकीत सर्व संबंधित विभागाच्या सूचना व केलेल्या नियोजना ची माहिती घेतल्या नंतर सहा. जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी मंदिर परिसरात कोविड संदर्भात जनजागृती करणारे फलक व लसीकरण कॅम्प आयोजित करण्याबाबत आरोग्य विभागाला,तर जिल्ह्यात आचार सहिंता असल्याने राजकीय लोकांना शाशकीय विश्राम गृह पूर्व परवानगी शिवाय देण्यात येऊ नये अशा सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केल्या.मंदिर परिरसात प्रसाद, महाप्रसाद भाविकांना देण्यात येणार नसून या यात्रेचे नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊनच सर्व विभागाने नियोजन करावे, शहरातील प्रत्येक नागरिकांनी व संबंधित विभागांनी माहूर गडावर येणारा प्रत्येक भाविक आरामात व आनंदाने दर्शन करून परत जाईल या साठी यात्रेकरूंना मंदिर प्रशासनाचे व शासनाचे नियम सामजस्य पणाने समजून सांगत त्यांना मदत करण्याचे अहवान देखील सहा. जिल्हाधिकारी पुजार यांनी केले.बैठकीचे प्रास्ताविक तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले.या वेळी नायब तहसीलदार गोविंदवार, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, तालुका आरोग्य अधिकारी,डॉ.आशिष पवार,विस्तार अधिकारी रमेश गावांडे, डॉ. किरणकुमार वाघमारे,वन विभागाचे वण परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव,विस्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कान्नव,व्यवस्थापक योगेश साबळे,यांच्या सह यात्रा सबंधित अधिकारी व कर्मचारी आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.