पुरस्थितित पुलावरून मार्ग काढताना दोन युवक गेले वाहून ; काळी दौ. परिसरातील वसंतनगर येथील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
काळी दौ ते दिग्रस मार्गावर असलेल्या वसंत नगर येथील पुलावरून पाण्यातुन दुचाकी ने मार्ग काढताना दोन युवक वाहून गेल्याची घटना ६ सप्टेंबरच्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घटना घडली. ज्ञानेश्वर जाधव (२८), सुरेश महिंद्रे (२७) रा. साई ईजारा ता. महागाव असे वाहुन गेलेल्या युवकाचे नाव आहे.
आज सायंकळ पासून काळी (दौ) सह परीसरात संततधार पाऊस सुरुच आहे. त्यातच वसंत नगर वरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते.

त्या पाण्यातुन दुचाकी क्रमांक एम. एच. २९ ए. व्ही. ००७४ काढण्याचे प्रयत्नात हे दोन्ही युवक वाहुन गेले आहे.
या बाबत दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांना माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक उपनिरीक्षक गुणवंत गोटे व सहकाऱ्यांना घटना स्थळी रवाना करण्यात आले.वाहून गेलेल्या युवकापैकी एक युवक मृत्वस्थेत आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली असून दुसऱ्या युवकाचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….