एकदरा शेतपडी प्रकरणात नायब तहसीलदार पाटे यांची पळवापळवी ; चौकशी समिती बदलण्याची युवासेना तालुका प्रमुख गजानन कदम यांची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड (राजकिरण देशमुख , माहुर) :- गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीने एकदरा येथील शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतीचे बोगस पंचनामे करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठ्याला पाठीशी घालण्याचे काम चौकशी समितीचे प्रमुख नांदेड तहसील चे नायब तहसीलदार पाटे हे करीत आहेत. पाटे यांना या समितीवरून तात्काळ हटविण्यात यावे व दोषीवर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा सेना तालुका प्रमुख गजानन कदम यांनी दिला आहे.
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात नांदेड तालुक्यात मोठी अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत करण्यासाठी आदेशित केले होते. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नांदेड तालुक्यातील एकदरा येथेही पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्तरीत्या पाहणी करणे आवश्यक असताना मनमानी कारभार चालवत चुकीचे पंचनामे तयार केले. परिणामी शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही योग्य मावेजा मिळाला नाही. गावातील काही शेतकऱ्यांना आपल्या हाताशी धरून उर्वरित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा डाव तलाठी अश्विनी सोलापुरे , कृषी सहाय्यक राजूरकर , ग्रामसेवक संतोष नलबवार यांनी केला . परिणामी ुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प केला होता त्या उद्देशाला हरताळ फासण्यात आला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायकांच्या बेजबाबदारपणामुळे एकदरा येथील शेतकऱ्यांना शेतकरीचा मावेजा योग्य रीतीने मिळाला नाही.
त्यामुळे सदरील दोषी अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युवासेना प्रमुख गजानन कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर नांदेड तहसील ने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदार पाटे आणि सहारे यांची समिती गठीत केली होती. समिती प्रमुख पाटे यांनी या प्रकरणांमध्ये आपल्या सहयोगी अधिकाऱ्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला असून तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची पाठराखण करत बोगस पंचनामे तयार करणाका प्रयत्न चालविला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या त्या सर्व शेतकऱ्यांना न बोलता आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांना बोलून खोटा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.पाटे यांनी निवडक शेतकर्यांचा जबाब नोंदविला आहे.अन्य शेतकरयांना विचारत घेतले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पाटे यांना या समिती वरून तात्काळ पाठविण्यात यावे त्यांच्या जागी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी , एकदरा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मावेजा मिळावा अशी मागणी युवा सेना तालुकाप्रमुख गजानन कदम यांनी केली आहे . शिवाय खोटे पंचनामे तयार करणाऱ्या तलाठी, करू सहायक आणि ग्रामसेवक यांना तात्काळ निलंबित करावे अनुषंगाने आज एकदरा येथील शेतकरी रावसाहेब भोजने, सुधाकर भोजने , दिनेश आरसुळे, माधव भोजने, व्यंकटी आर्सुळे, माधवराव आरसुळे, साहेब आरसुळे, रामराव भोजने, रामराव आरसुळे , विष्णू आरसुळे यांनी तहसीलदार आंबेकर यांनी भेट घातली. या प्रकरणात जाणीवपूर्वक खोटा अहवाल तयार करण्याची आणि दोषी तिन्ही कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.