अंबोडा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय झाडांची कत्तल
ग्रामसेवकांचे पाठबळ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यू. एन.वानखेडे
पुसद कार्यालय :
तालुक्याच्या 2 किलोमीटरवर असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारुपास आलेली आंबोडा ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील असंख्य वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करण्यात आली आहे. याबाबत गावकऱ्यांचं ग्रामपंचायत मधील चौकशी केली असता यासंदर्भात कोणीही बोलण्यास तयार नाही.सदर प्रकरणाची तक्रार अंबोडा येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास तायडे यांनी महागांव तहसील वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे रीतसर तक्रार केली आहे.
परंतु या तक्रारीला न जुमानता अंबोडा येथील संबंधित ग्रामसेवक यस .आर.देशमुख यांनी या कतल झालेल्या झाडां ्चा सौदा अवैद्य कत्तल करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांना दिला. हे रुक्ष निंबा जातीचे असून तीन नग शंभरपेक्षा अधिक खोलायचे असल्याचे समजते. विशेषतः हे वृक्ष हनुमान मंदिराच्या परिसरात असून हे प्राचीन वृक्ष असल्याचे तेथील नागरिकांतून बोलल्या जाते. यासंदर्भात वृक्ष अधिकारी हेमंत उबाळे महसूल विभागाचे तहसीलदार नामदेव इसलकर, यांनी या प्रकरणी आपली भूमिका ताठपणे मांडली नाही हा सौदा अर्थपूर्ण मैत्री झाला अशी या प्रकरणावरून दिसून येते.
नुकत्याच झालेल्या ग्रा.प.निवडणुकी मध्ये वरचढ झाली होती,यातूनच पराभव झालेल्या एका विशिष्ट पॅनल च्या संबंधिताच्या घरा शेजारील या वृक्षांची कत्तल झाली या प्रकरणी कोणतीही शासकीय परवानगी न घेता विशेषतः हे वृक्ष कुठल्याही रस्त्यात अडथळा आणणारे रुक्ष न असताना या वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करण्यात आली याबाबत अंबोडा येथील रहिवासी कैलास तायडे यांनी रीतसर तक्रार संबंधित विभागाकडे केली आहे विशेषतः ग्रामपंचायत पदाधिकारी तथा सचिवांचे यामध्ये साठे लोठे असल्याचे बोलल्या जात आहे.
एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा या ब्रीद वाक्य खाली कार्यक्रम राबवित आहे अंबोडा ग्रामपंचायत तीत उप सरपनच सचिव यांचे या प्रकरणांमध्ये हात ओले असल्याचे बोलल्या जात आहे एकीकडे अंबोडा ग्रामपंचायतीने मागील चार वर्षांपूर्वी अंबोडा येथील स्मशानभूमी मध्ये शेकडो वृक्षांची लागवड करून त्याठिकाणी संगोपन केले आहे. आजही या बाबींचा पुरावा जर आपण ग्रामपंचायत मधील स्मशान भूमिमध्ये गेले असल्यास पहावयास निश्चित मिळेल.एकंदरीत या आधीची ग्रामपंचायत बॉडी वृक्ष संगोपन करीत होती परंतु नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर आलेले नवनियुक्त पदाधिकारी तथा सचिव या गावातील रस्त्याच्या काठावरील वृक्षांची कत्तल करीत आहेत हा विषय मोठा चर्चे चा ठरत आहे.
एकंदरीतच अंबोडा ग्रामपंचायत मध्ये वृक्ष कतली चे प्रकरण मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे विशेषता ग्रामपंचायत मधील रस्ते रोड नाल्या या संबंधित विकास कामे होत असताना प्राचीन वृक्षांची असलेली कत्तल कशी होते या दिशेने ग्रामपंचायत मान्य प्र करणे गरजेचे होते परंतु येथील पदाधिकारी कथा सचिव यांनी या वृक्षांची केलेली कत्तल ही कोणतीही शासकीय परवानगी न घेता केल्या गेले आहे. विशेषता याबाबतची तक्रार गावकऱ्यांकडून केल्या गेली आहे परंतु यासंदर्भात अद्यापही संबंधितांनी कोणतीही चौकशी केली नाही. हा संशोधनाचा विषय आहे.