अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग प्रकरण ; आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांना मुहूर्त सापडेना ; पोलिसांची भूमिका संशयास्पद…
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग प्रकरण ; आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांना मुहूर्त सापडेना ; पोलिसांची भूमिका संशयास्पद…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :- ९६३७८८६७७७
महागाव :-
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीस तिचे वस्त्र जबरदस्तीने काढणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी महागाव पोलीस उदासीन असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
महागाव तालुक्यातील आनंदनगर (ता.१६) येथील पिडीत मुलगी आपल्या वडील व बहिणीसोबत मक्त्याने केलेल्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होती. सोबत गावातील उत्तम राठोड हा सुद्धा शेळ्या चरण्यासाठी आला होता.पिडीत मुलीच्या वडील कामानिमित्त बाहेर जात असल्याने त्यांनी आरोपी उत्तम रतन राठोड(वय ५५)याला शेतात चरत असलेल्या शेळ्यांकडे व मुलींकडे लक्ष ठेव मी गावात जावुन येतो म्हणुन सांगितले .थोड्यावेळाने पीडितेची मोठी बहीण शेतात काम करण्यासाठी निघुन गेली.त्याच वेळी आरोपी उत्तम राठोड याने संधीचा फायदा घेवुन शेळ्या चारणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला लगतच्या नाल्यात नेले. तिला मारहाण करून बळजबरीने तिचे वस्त्र काढण्यास सांगितल्याने. पिडीत अल्पवयीन मुलीने आरडाओरड केली असता शेजारच्या शेतातील मजुर महिलेने ही बाब पीडितेच्या वडीलांना सांगितली. त्यावेळी तिच्या वडिलांनी नाल्याकडे धाव घेतली. पहिले तर आरोपी आपल्या अल्पवयीन मुलीबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा तिच्या वडिलांनी आरोपीला “तु असा का करीत होता” असा जाब विचारला असता आरोपीने पिडीत मुलीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून पळ काढला.यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनाही पीडित मुलीसह महागाव पोलीस स्टेशन गाठून घटनेची फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महागाव पोलिसांनी तत्काळ आरोपी उत्तम राठोड विरूद्ध भादंवि १८६०-३५४(अ),३५४(ब),३२३,३५४बालकांचे लैंगिक अपराधा पासुन संरक्ष अधिनियम२०१२-८,१२नुसार गुन्हा दाखल केला.मात्र जवळपास १२ दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपीला अजुन पर्यंत अटक करण्यात आली नसुन पोलिसांना आरोपीच्या अटकेसाठी अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने महागाव पोलीस अल्पवयीन बालकांवर झालेल्या अत्याचारा बद्दल किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होत आहे. अवैध धंदे चालकांकडून न चुकता वसुली केली जात असतांना मात्र या गंभीर गुन्ह्यातील आरोपी ला अजुन अटक झाली नसल्याने महागाव पोलिसांप्रती नागरिकांमधून तीव्र नाराजीचे सुर उमटत आहेत.