यवतमाळ जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा :- आ.इंद्रनील नाईक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ’ जाहिर करा अशी मागणी आमदार इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी परतीच्या पावसामुळे हवाल दिल झालेला आहे. कापणीसाठी आलेला सोयाबीन असो की कापूस, या अतिवृष्टी मुळे शेतक-यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातून निघून गेला आहे.पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी बांधव आर्थिक दृष्टचक्रात सापडले आहे.
अशा स्थितीत जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेती नुकसानीची तातडीने पाहणी करून जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ ‘ जाहिर करून शेतक-यांना आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.या निवेदनासोबत शेतातील उद्धवस्त झालेले सोयाबीन व निकामी झालेले कापसाचे बोंड प्रत्यक्षात दाखवून स्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यात आले.
यावेळी जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, नानाभाऊ गाडबैले, वसंतराव घुईखेडकर, विवेक देशमुख, रा.काँ. महिला जिल्हाध्यक्षा क्रांतीताई राऊत, बाबुसिंग आडे, जि. प. सदस्य अशोक जाधव, हरीश कुडे आदि उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….