उमरखेड मध्ये छत्रपतींच्या पुतळ्याबाबत काँग्रेस -शिवसेनेकडून नागरीकांना संभ्रमीत करण्याचे काम-भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
मागील अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच राजकारण सुरू आहे. अलीकडच्या काळात इतर राजकीय पक्षांनी उडी घेतली असून शहरातील लोकांना काँग्रेस व शिवसेनेकडून संभ्रमीत करण्याच काम सुरू असल्याचा आरोप भाजपाचे जील्हाध्यक्ष नीतीन भुतडा यांनी उमरखेड शहर भाजप कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत केला .
कॉंग्रेसने शहर कमीटीने काल प्रसिध्दी पत्रक देवुन शिवाजी चौकातच छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे म्हणून पाठींबा दर्शविला . जर काँग्रेसच्या शहर अध्यक्षाला शिवाजी चौकातचपुतळा करायचा होता तर त्यांची डिसेंबर २०१६पर्यंत नगरपालिकेत सत्ता होती . यांच्याच कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज शॉपींग कॉम्पलेक्सचे नामकरण करण्यात आले व तिथेच शिवाजी चौक आहे. तर आता पाठींबा देणाऱ्यांनी त्यावेळेस कॉम्पलेक्सची रचना करतांना छत्रपतींच्या पुतळ्यासाठी जागा का उपलब्ध केली नाही असा सवाल यावेळी भुतडा यांनी उपस्थित करीत पालकमंत्री संजय राठोड यांचेवर निशाना साधला ते म्हणाले की , पालकमंत्री म्हणतात जनभावनेचा आदर करून शिवसेनेचा पाठींबा दिला . मग काँग्रेस व शिवसेनेची सत्ता राज्यात आहे .कॉंग्रेसचे अशोक चव्हाण सा.बा . विभागाचे मंत्री आहेत .पालकमंत्री व कॉंग्रेसच्या शहर अध्यक्ष अग्रवाल यांनी त्यांच्या संबंधाचा फायदा घेवुन शहर विकासासाठी शिवाजी चौकातच पुतळा उभारण्यासाठी चार ओळीचे शासनाचे पत्र आणावे आमची काहीही हरकत राहणार नाही . मुळात प्रश्न ना हरकत प्रमाणपत्राचा आहे असे सांगून भुतडा म्हणाले की , संघर्ष समीतीने सुचविलेल्या चारही जागा सा.बां . विभाग , नगररचना विभाग यांनी रद्द केल्या आहेत त्यामुळे पुतळ्याला घेवुन राजकारण करणाऱ्यांनी राजकारण न करता महाराजांचा पुतळा उमरखेड शहरात झाला पाहीजे यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही यावेळी भुतडा यांनी देत संघर्ष समीतीने सुचविलेल्या जागांचे अहवाल रद्द केल्याची कागदपत्रे दाखवीली . शेवटी भुतडा म्हणाले की , नगरपालिकेच्या २५ वर्षाच्या सत्तेत कॉंग्रेसने शहरात जेवढी विकासकामे केलीत त्याहून दुप्पट कामे केवळ या चार वर्षात आम्ही केलीत . आता वर्षभरापासून राज्यात कॉंग्रेस, सेना , राकॉची सत्ता आहे यांनी एक रुपयाचा निधी आणणे तर दुरच पण अखर्चीक निधी परत घेण्याच पाप या सरकारने केले असल्याचे सांगून ४ वर्षात न . पा .ने१००करोड रुपयाच्यावर निधीचे काम केले असल्याचे भुतडा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगीतले .