पैनगंगेच्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील जमीन पाण्यात;विदर्भ- मराठवाड्याचा संपर्क तुटला
पोलीस प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग नागपूर तुळजापूर केला बंद
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात व पैनगंगा नदीवरील जयपूर बॅरेज जिल्हा वाशिम येथील बंधाऱ्याचा विसर्ग वाढल्याने ईसापुर धरणामध्ये शंभर टक्के जलसाठा जमा झाला आहे ईसापुर धरणातून सात गेट उघडल्याने पैनगंगा नदीवरील मारलेगाव येथील हदगाव उमरखेड पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरून पोलीस प्रशासनाने वाहतूक बंद केली आहे
इसापूर धरणांमध्ये दिनांक 14 सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हापासून धरणाचे दरवाजे बंद केले नाही त्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरल्याने पैनगंगा सीमेवरील मराठवाडा व विदर्भातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे
पैनगंगा नदीवरील शेंबाळपिंपरी – कळमनुरी पूल, बिटरगाव करोडी पुल, हदगाव – उमरखेड पुल, पिंपळगाव टाकळी पुल ,मुरली – इसापूर हे सर्व एकूण सहा पूल पाण्याखाली गेले असल्याने विदर्भ मराठवाड्याचा संपर्क फुटल्याची परिस्थिती दिसून येत आहे. सध्या नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर हदगाव – उमरखेड हा पूल पाण्याखाली गेल्याने पोलीस प्रशासनाने पुलावरून वाहतूक करण्यास बंदी केली आहे
पैनगंगा नदी पात्रात वाढता पाण्याचा प्रवाह पाहत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात तून गावामध्ये शिरत असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे ठरत आहे सध्या अशीच स्थिती राहिल्यास व मुसळधार पाऊस पडत राहिल्यास पैनगंगा नदीपात्रातून मोठा विसर्ग होऊ शकते त्यामुळे महापुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज पर्यावरण तज्ञ नोंदवत आहे.
सकाळी 11 वाजता पाण्याचा प्रवाह पुलाच्या वरून होत असताना उमरखेड पोलीस प्रशासनाने रस्ता बंद केला