शेतकऱ्यांच्या अट्टाहासाने साखर कारखाना विक्रीचा डाव उधळला : जगदीश नरवाडे
जन आंदोलन संघर्ष आधार समितीच्या प्रयत्नाला यश ; शेतकऱ्यांनी मानले कारखाना व्यवस्थापकाचे आभार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६४७८८६७७७
महागाव :
तालुक्यातील शेतकऱ्यांची एकमेव अस्मिता असलेल्या नॅचरल शुगर कारखाना युनिट -२ विक्रीची निविदा अखेर शेतकऱ्यांच्या अट्टाहासाने रद्द करण्यात आली आहे .कारखाना विक्रीची निविदा जाहीर होताच जनआंदोलन संघर्ष आधार समिती संस्थापक जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधाने कारखाना व्यवस्थाकानी निविदा प्रक्रिया रद्द केल्याने शेतकरी सुखावला आहे . ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता नवसंजीवनी मिळणार आहे.
कारखाना मालकाने शेतकऱ्यांची पर्वा न करता ५० कोटीचा कारखाना दुपटीने विकण्याचा डाव आखला. त्यातून भरमसाठ नफा मिळणार या लालसेने कारखाना मालकाने सदर कारखाना विक्रीस काढला.मात्र
कारखाना विक्रीची निविदा प्रकाशित होताच
महागाव ,उमरखेड ,पुसद तालुक्यातील दहा हजार हेक्टरवरील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले होते. शेतात उभा असलेल्या उसाची हमी कोण घेणार या विवंचनेत जनअंदोलन संघर्ष आधार समिती चे संस्थापक जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखाना विक्रीचा प्रचंड विरोध केला. कारखाना घेण्यासाठी मोठ्या उद्योजकांनी निविदा अर्जाची उचल केली.परंतु शेतकऱ्यांचा कारखाना विक्रीचा विरोध कायम असल्याने काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे कारखाना मालकाला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. आणि काढलेली निविदा रद्द करावी लागली.जन आंदोलन संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे प्रगतशील शेतकरी दिलीपराव सुरोशे, तातेराव गावंडे, विजय राऊत, पंजाबराव पवार ,सुभाषराव कुर्मे ,कपिल नरवाडे, गजानन नजरधने, कैलास देशमुख ,किसन उकंडे, सदाशिव हेडे , व आदी शेतकऱ्यांनी कारखाना विक्रीचा विरोध दर्शविल्याने कारखाना विक्रीचा डाव उधळून लावण्यात यश आल्याचे जगदीश नरवाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.