दिलासा : ईसापुर धरण 50 टक्के भरले
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यु.एन. वानखेडे
पुसद :
यवतमाळ व हिंगोली या दोन जिल्ह्याच्या सीमेवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापुर धरण आहे हे धरण पेनगंगा नदीच्या स्त्रोतांकडून मुखाकडंच पहिले मोठे धरण आहे .
धरणाची अंतिम सिंचनक्षमता एक लाख सात हजार हेक्टर असून 95 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी घोषित करण्यात आलेले आहे. ईसापुर उजवा कालवा 119 किलोमीटर व डावा कालवा 84 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या धरणाचे पाणी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व पुसद तालुक्याला तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत तालुक्याला आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर, हदगाव, अर्धापूर, मुदखेड या तालुक्याला सिंचनासाठी मिळते.
या धरणामुळे यवतमाळ हिंगोली आणि नांदेड या तीनही जिल्ह्याला सिंचनाचे पाणी उपलब्ध होते.हे धरण किमान तीन वर्षातून एकदा पूर्ण क्षमतेने भरत असते यावर्षी पाऊस कमी असताना सुद्धा हे धरण 50 टक्क्यांपर्यंत भरले असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यानंतरही ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाळा बाकी असून यापुढे या दोन महिन्यात धरण भरण्याची शक्यता आहे.बुलढाणा जिल्ह्यात पाऊस झाल्यास या धरणाचा पाणी साठा वाढतो त्यामुळे दोन महिन्यात चांगला पाऊस झाल्यास हे धरण भरण्याची शक्यता आहे.
ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर धरण दैनिक पाणी पातळी अहवाल
दिनांक 30/07/2020
पाणी पातळी-{435.57}मिटर
पाणीसाठा- {488.46}द.ल.घ.मी .
टक्केवारी-.{50.66%}
दैनिक पाऊस – 11 मिलीमीटर
एकूण पाऊस 467 मिली मिटर.