वसंतरावजी नाईक साहेब यांना भारतरत्न प्रदान करण्याकरिता केंद्र शासनाकडे शिफारस करा ; आमदार इंद्रनील नाईक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याकरता केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी या आशयाचे पत्र उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना आमदार इंद्रनील नाईक यांनी नुकतेच दिले आहे.
स्वर्गीय वसंतरावजी नाईक महाराष्ट्र राज्याचे सलग बारा वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले त्यांचा राजकीय प्रवास, मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय तसेच शेती आणि शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे नव्हे तर अभ्यासाचे विषय होते त्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण केला. कापूस एकाधिकार योजना राबवली तसेच महाराष्ट्रात धवल क्रांती घडवून आणली.
शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात कृषी विद्यापीठाची स्थापना केली. औष्णिक विद्युत प्रकल्प उभारले विकासासाठी आवश्यक असणारे वीज आणि पाणी या मूलभूत गरजांची त्यांनी सोय केली असे विविध लोकहिताचे निर्णय घेतले. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संघटना त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत सातत्याने मागणी करत आहेत. महाराष्ट्रासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विधिमंडळ /मंत्रिमंडळाने ठराव घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याकरीता केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार इंद्रनील नाईक यांनी एका पत्राद्वारे केली आहे.