सोमवारी महाराष्ट्रभर फार्मसी कृती समितीकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
👉पदविका आणि पदवीच्या बॅकलाँग , एटिकेटी व रेगुलर परिक्षा रद्द करण्याची मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
यवतमाळ ः
राज्य सरकारने अंतिम वर्ष एटिकेटी व बॅकलॉग परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत असं जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे .यामुळेच सर्व विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.पदविका आणि पदवीच्या बॅकलाँग , एटिकेटी व रेगुलर च्या अंतिम वर्षाचे
केंद्र सरकारने जरी परीक्षेसाठी परवानगी दिली असती तरी महाराष्ट्र राज्य सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करा या मागणीवर ठाम आहे. आज महाराष्ट्रात कोरोणा रुग्णांची संख्या २ लाखाच्या वर पोहचली आहे .अशा परिस्थितीत खरंच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे शक्य आहे का?हा विचार केंद्र सरकारने करायला हवा. एकीकडे लोक एकत्र यायला नको म्हणून लॉकडाउन वाढवायचा आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या जिवाला आणि पोचवायची यात कसला आलं शहाणपण हे देखील केंद्र सरकारने स्पष्ट करायला हवं. असे मत फार्मसी कृती समितीने उभे केले आहेत.या निर्णयाविरोधात सोमवारी (ता.१३) रोजी फार्मसी कृती समितीतर्फे राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती फार्मसी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष आकाश हिवराळे, उपाध्यक्ष परमेश्वर खाकरे-पाटील यांनी प्रसार माध्यमांना बोलताना दिली आहे.
विद्यार्थ्यांनी शक्य असेल तिथे करावे आंदोलन : कृती समिती प्रदेशाध्यक्ष
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शक्य असेल तिथे सोशल डिस्टंसिंग पाळतअथवा आपल्या घरी हातात मेणबत्ती व तोंडावर पट्टी बांधून सोशल मीडियावर राज्यभरातील विद्यार्थीनी निषेध व्यक्त करावा असे आवाहन फार्मसी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष आकाश हिवराळे यांनी केले आहे.
पदविका आणि पदवीच्या बॅकलाँग , एटिकेटी व रेगुलर असलेल्या प्रथम, व्दितीय आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी व पालक यांनी आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन फार्मसी कृती समितीने जिल्हाध्यक्ष सुंदर नाईक, उपजिल्हाध्यक्ष साद शेख यांनी आवाहन केले आहे.