बनावट सोयाबीन बियाणांमुळे शेतकरी हवालदील

बियाण्यांच्या गुणवत्तेत फेरफार होऊ शकतो असा इशारा किसान सभेने दिला होता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ-
मराठवाडा आणि दिर्भातील अनेक जिल्ह्य़ात सोयाबीनचे सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे सोयाबीन पेरा वाया गेल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. या फसवणुकीची सरकारने दखल घेऊन दुबार पेरणीसाठी मदत करावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. बियाण्यांच्या गुणवत्तेत फेरफार होऊ शकतो असा इशारा किसान सभेने दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांचे या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. तरीही खबरदारी न घेतल्याने सोयाबीनच्या बनावट बियाण्यांचे अनेक ठिकाणी वितरण झाले असून पेरा वाया जाण्याची परिस्थती निर्माण झाली आहे. मराठवाडा-विदर्भात परभणी, बुलढाणा, नांदगाव खांडेश्वर आदी भागात बनावट सोयाबीन बियाणे वाटप झाल्याचे समोर आले असून अन्य भागातूनही पेरा वाया गेल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी दिली

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..