इरफान खानच्या निधनानंतर सुशांतला मिळाली होती ‘ही’ ऑफर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
.मागील दोन महिन्यांमध्ये बॉलीवूडला एका मागोमाग एक मोठे धक्के बसले . इरफान खानच्या निधनानंतर , ऋषी कपूर व त्यानंतर वाजीद खान , बासू चटर्जी व काल अचानक अनपेक्षितरित्या सुशांतची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली.
दिग्दर्शक आनंद गांधी इमर्जेस नावाचा चित्रपट बनविणार आहेत आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी इरफान खानला घेतले होते. त्याच्या निधनानंतर त्यांनी सुशांतला घेण्याचे निश्चित केले होते. मात्र आता त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
” शिप ऑफ थिसीस ” चे 2013 ला आनंद गांधी यांनी काम केल्यानंतर त्यांच्या नावाची मोठी चर्चा बॉलीवूडसह विविध देशांमध्ये होती.तुंबाड “च्या लेखन व क्रियेटीव्ह डायरेक्टर म्हणूनही त्यांच्या नावाचा गाजावाजा झाला . त्यांनी त्यांच्या आगामी फिल्मचे नाव ” इमर्जेस ” ठेवले आहे .
आनंद आणि सुशांत हे दीर्घ काळापासून मित्र होते . मात्र सुशांतच्या या अचानक जाण्याने ते कोलमडून गेले आहेत . इरफान व आता सुशांतच्या अकाली जाण्याने मला मानसिक धक्का बसला आहे, असे ते म्हणाले.
जवळपास पाच वर्षे आनंद यांनी या चित्रपटाच्या पटकथेवर काम केले आहे. आनंद यांनी सुशांतला याबद्दल सांगितले होते. याशिवाय अन्य चार अभिनेत्रींची निवड बाकी होती .आपल्या चित्रपटासाठी आनंद यांनी ऑस्ट्रेलियन अभिनेता ह्युगो व्हीविंगला निश्चित केले होते

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….