ज्येष्ठ नेत्या सुर्यकांता पाटील यांनी केली राजकिय निवृत्तीची घोषणा!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रशांत भागवत ९४२२८६७७४८
उमरखेड :
नांदेड-हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे स्थान असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी अखेर राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सुर्यकांता पाटील या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु; प्रवेश केला, तरी राजकारणापासून अलिप्त राहिल्या.बुधवारी रात्री त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे समाजमाध्यमाव्दारे जाहीर केले.
महाराट्राच्या राजकारणातील प्रखर व स्पष्ट वक्त्या व मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या सुर्यकांता पाटील यांनी राजकारणात येण्यापूर्वी पत्रकारितेत अनेक वर्षे काम केले. त्यानंतर त्या नांदेड नगरपालिकेच्या निवडणुकीत जनसंघाच्या तिकिटावर निवडून आल्या. हदगाव विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढताना त्यांनी स्व. बापूराव पाटील आष्टीकर यांचा पराभव केला. त्यानंतर त्या नांदेड व हिंगोली या दोन्ही मतदारसंघातून खासदार व केंद्रीय राज्यमंत्री राहिल्या.
युपीए सरकारमध्ये सन २००४ ते २००९ या पाच वर्षांच्या काळात केंद्रात विविध खात्याच्या त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले. शरद पवार यांच्या कट्टर समर्थक व पक्षातील वजनदार नेत्यां म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. २००९ साली सुभाष वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हा पासुन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्यांची उपेक्षा होत होती. सन २०१४ च्या हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटयाला गेला. तेव्हांपासून त्या पक्षावर नाराज होत्या. मागच्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला.परंतु त्या कधीही पक्षात स्थिरावल्या नाहीत. पक्षाने सुद्धा त्यांच्या कार्य कर्तत्वाची दखल घेतली नाही. कदाचित अशी खंत ही त्यांच्या मनात असावी,त्यामुळे यापुढे राजकारणाच नको या भूमिकेतून त्यांनी राजकरणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय असावा.
काय म्हणाल्या सुर्यकांता पाटील ?
(आम्ही पाॅलिटिक्स स्पेशल लाईव च्या वाचकासमोर ज्यांनी लिहलेला मजकूर जशास-तसा वाचायला देत आहोत)
आता थांबावे असे वाटत नाही । ना किसींसे दोस्ती ना किसींसे बैर
खूप प्रेम मिळाले जळणारे होते पण प्रेम करणार्यांची
संख्या अधिक होती मला ते सर्व मिळाले जे एक सामाजिक जीवनात असणार्या व्यक्तीला मिळायला हवे
४३ वर्ष राजकारणात होते एखाध्या राजकुमारी सारखी राहिले ४०० रुपयांची साडी ४ हजाराच्या थाटात नेसली मिळालेले काम मन लावून केले
आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अश्या अनोख्या प्रांतात माझ्या सारखी मनस्वी रमू शकत नाही
राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण म्हणून
एवढा शो करायचा
सगळ्यांनीच प्रेम दिले सन्मान दिला काहीच तक्रार
नाही आपलीच लायकी नाही हे समजले होते रागात घेतलेले निर्णय असेच असतात ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येते नाही तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत हे पक्के समजलंय
त्या मुळे धाकटे लोक राजकारण सोडतो म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे
एकटीने सगळे जिंकले लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास करायची माझी तयारी नाही
ज्यांच्यासाठी काम केले त्यानी सन्मानही केला आणि
आज जे नाहीच आहेत त्यांच्या आठवणी मनात आहेत
आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे
पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला
जेव्हा लिहायचे तेवा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवीत आहे
या पुढे नव्या पिढीसाठी काम करील घरी बसणार नाही
बसून कुरवळण्या एवढे काही नाही माझ्या जवळ
विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवीत आहे । सगळ्या सहप्रवासी सहकार्यांचे हार्दिक आभार ।मी आहे कधीही या घर आणि मी तुमचीच आहे ।नमस्कार सगळ्यांना थांबते.