सांगली लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला ; लोकसभेच्या आखाड्यात महायुतीमधील पक्षाची थेट ‘एन्ट्री’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सांगली लोकसभा निवडणूकीच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आता उडी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाढवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
स्वबळावर निवडणूक लढवण्याची निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे.
महादेव जाणकर महायुतीमधून बाहेर ?
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. राज्यात सत्ताधारी पक्षासोबत विरोधकांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जातेय. आता महायुतीमधील वाद समोर आला आहे. महादेव जाणकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आले आहे. कारण, राष्ट्रीय समाज पक्षाने सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. त्याशिवाय लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारीही सुरु केली आहे. महादेव जाणकर हे महायुतीमधील महत्वाचे घटक मानले जात होते, त्यांच्या बाहेर जाण्याने एनडीएच्या मतांवर फक पडू शकतो. महादेव जाणकर यांच्यामागे धनगर समाजाची मतांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खासकरुन पश्चिम महाराष्ट्रीतील मतांवर फरेक पडेल, असा अंदाज आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार ठरला –
सांगली लोकसभा मतदार संघात (Sangli Lok Sabha constituency) सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता महायुतीचे घटक पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कालिदास गाढवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कालिदास गाढवे हे उच्चशिक्षित तरुण आहेत. नुकतेच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाढवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कालिदास गाढवे यांनी लोकसभा निवडणुक घडवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे,यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातल्या तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे. माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाढवे यांनी व्यक्त केला आहे.