वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेचे काम जलद गतीने व्हावे – खा. रामदास तडस यांनी घेतली आढावा बैठक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटर असा रेल्वे मार्ग तयार होणार आहे. वर्धा जिल्हयातील पहिल्या टप्पातील वर्धा ते कळंब 40 किलोमीटर व कळंब ते यवतमाळ 38 किलोमीटर, वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाचे वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी 1278 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. वर्धा ते कळंब, केन्द्र शासनाकडून निधी प्राप्त झालेला असुन राज्यसरकारकडे निधी प्रलंबीत आहे. तसेच वर्धा-नांदेड रेल्वेचे काम एक ते दिड वर्षात पुर्ण होईल अशी माहिती येथे आढावा संबधीत अधिका-यांनी बैठकीत दिली.वर्धा-यवतमाळ या 78 किलोमीटर लांबीच्या रेल्वे कामाच्या प्रगतीचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतला.
वर्धा-नांदेड रेल्वे लाईनकरिता 48.48 हेक्टर जमीन शेतक-याकडू भुसंपादन करावयाची होती पैकी 8.37 हेक्टर जमीन संपादीत केलेली असुन सालोड, हिरापूर, देवळी, बाबुळगांव, भिडी, शिरपूर, रत्नापूर, सेलसुरा, मेघापूर या गावातील शेतक-याकडून 40.11 जमिन शेतक-याकडून संपादीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच वर्धा जिल्हयातील रेल्वेला लागणा-या जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण होईल अशी माहिती भुसंपादन अधिकारी यांनी दिली. वर्धा – कळंब दरम्यान दरम्यानच 800 ते 40000 दरम्यान 10 मोठ्या पुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. तसेच यशोदा नदीवरील व भीडी येथील दोन पुलाचे काम पुर्ण झालेले असुन वर्धा नदीवरील रेल्वे पुलाचे काम न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबीत होते, परंतु आता उर्वरीत कामाची निवीदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. वर्धा-कळंब दरम्यान स्टेशन इमारत व कार्यालये बांधकामाची निविदा अंतिम झाली, वर्धा-कळंबसाठी स्टाफ क्वार्टर बांधणे, वर्धा-कळंबसाठी आरओबी बांधण्यासाठीची निविदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मध्ये रेल्वे विभागचे उप अभियंता स्थापत्य एच.एल.कावरे यांनी दिली. प्रकल्प कालबध्द वेळेत पुर्ण व्हावा म्हणून 2014 पासुन सतत पाठपुरावा करीत असुन लोकसभा प्रश्नाच्या माध्यमातून माझे सतत प्रयत्न सुरु आहेत. हा प्रकल्प पंतप्रधान कार्यालयाच्या प्रगती पोर्टलवर असल्याने केन्द्रशासन या प्रकल्पाकरिता सकारात्क आहे. वर्धा जिल्हयातील देवळी, भिडी या भागातून हा रेल्वे मार्ग जात असल्याने देशातील रेल्वे नकाशावर याची नोंद होणार आहे, त्यामुळे वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेचे काम जलद गतीने पुर्ण करण्याकरिता प्रलंबीत कामांना गती द्यावी तसेच वर्धा-यवतमाळ मध्ये रेल्वे लाईन करिता शेतक-यांच्या जमिन भुसंपादन करतांना शेतक-यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच भुसंपादन केल्यानतर त्वरीत मोबदला देण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना यावेळी उपस्थित अधिका-यांना तडस यांनी दिल्या.