“हिंदी राष्ट्रभाषा नाहीच…!” राज ठाकरे यांचा भाषांसंदर्भात नेमका काय सल्ला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठी भाषा सर्वात उत्तम आहे. समृद्ध भाषा आहे. परंतु आज मराठी भाषा घालवण्याचा राजकीय प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संताप होतो. आता कोणीही समोर येऊ द्या, आपण मराठीच बोला.
एखादा चांगला विनोद मराठीत होतो तसा कोणत्याही भाषेत होत नाही. तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, पण जिथं राहताय ती भाषा प्रथम शिका. त्यात कसला कमीपणा आला.
पंतप्रधान मोदींवर टीका अन् स्पष्टीकरण
राज ठाकरे सरकारी कार्यक्रमात बोलत होते. परंतु त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली अन् स्पष्टीकरणही दिले. पंतप्रधान त्यांची भाषा आणि राज्यांबद्दल प्रेम आहे. त्यांना स्वत:चच्या राज्याचे प्रेम लपवता येत नाही. यामुळे जगातील सर्वोच्च पुतळा गुजरातमध्ये झाला. हिऱ्यांचा व्यापार गुजरातमध्ये गेला. गिफ्ट सिटी गुजरातमध्ये होत आहे.
जर पंतप्रधानांना त्यांच्या राज्यासंदर्भात प्रेम असेल तर आपणास का नाही. काही जण म्हणतील मी मोदी यांच्यावर टीका करत आहे. परंतु ही टीका नाही. त्यांच्यासारखे प्रेम आपण आपल्या राज्याबद्दल दाखवले पाहिजे. आपण आधी महाराष्ट्राकडे लक्ष दिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.