जरांगे पाटलांनी पुन्हा बोलावली मराठा बांधवांची बैठक, समोर आलं कारण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकताच त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेढा भरवून जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं. मागण्या मान्य झाल्यानं मराठा बांधवांमध्ये उत्साहाच वातावरण आहे.
दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठ्यांची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी मोठा संघर्ष उभा केला. या संघर्षाला मोठं यश मिळालं असून राज्य सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळं राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. याच जल्लोषाची जरांगे पाटील विजयी सभा घेणार आहेत. विजयी सभेबाबत चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज गोदापट्ट्यातील 123 गावांतील मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे.आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून, जरांगे पाटील मराठ्यांशी चर्चा करणार आहेत.
मराठा बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे शनिवारी आपन आपलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. सोबतच जर काही दगाफटका झाला तर मी स्वत: आझाद मैदानात पुन्हा उपोषणाला बसेल असंही ते म्हणाले आहेत. मागण्या मान्य झाल्यामुळे मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.