शरद पवार हेच खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे मारेकरी ; नरेंद्र पाटलांच्या गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा आरक्षण हा प्रश्न संपूर्ण समाजासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारांचे असलेल्या महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. त्यामुळे शरद पवार हेच खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केला.
माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार (ता. २) रोजी सांगोला तालुक्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. तालुक्यात खवासपूर, महूद, वाकी शिवणे, वाढेगाव, वाटंबरे, एखतपूर, आलेगाव इत्यादी गावांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, तालुकाध्यक्ष अतुल पवार आदी उपस्थित होते.
नरेंद्र पाटील म्हणाले, सारथीचा माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या असंख्य मराठा विद्यार्थ्यांना महायुती सरकारने आर्थिक मदत केली आहे. यापुढेही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परिस्थिती नसल्याने आपला अभ्यास अर्धवट सोडावा लागणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हजारो मराठा तरुणांना बिनव्याजी कर्जपुरवठा केला आहे.