त्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच संस्थात्मक विलागिकरणात ठेवण्याची केली मागणी
पुसद उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
स्थानिक उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील कक्ष क्र.३६ मध्ये दि.१३ मे २०२० रोजी क्वारेंटायीन करण्यात आलेल्या हुडी येथील पतीपत्नींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या कालावधीत कर्तव्यावर असलेल्या महिला-पुरुष कर्मचाऱ्यांनी आपणास संस्थात्मक विलगीकरनात ठेवण्याची मागणी लेखी निवेदनातून केली आहे. कोरोनाचे लक्षणे दिसलेल्या हुडी येथील रुग्णास विलगीकरन कक्षात न ठेवता उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष क्रमांक ३६ मध्ये ठेवण्यात आले होते.
आ.इंद्रनील नाईक व विधानपरिषद सदस्य आ.डॉ. वजाहत मिर्झा यांचे समक्ष बाधित किंवा संशयित रुग्ण स्थानिक कक्ष क्रमांक ३६ मध्ये ठेवण्यास कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला होता.तरीही हुडी येथील संशयित असलेल्या रुग्णास कक्ष क्रमांक ३६ मध्ये संदर्भित ठेवले. दि.१५ मे ते १७ मे रोजी मध्यरात्री पर्येंत म्हणजेच ५१ तास सदर उल्लेखित रुग्ण स्थानिक रुग्णालयात वास्तव्यास होता. कोरोना पॉझिटीव्ह निघालेली त्याची पत्नी सुद्धा २४ तास बाधित पती समवेत रुग्णालय परिसरात मुक्तसंचार करीत होती. त्या ५१ तासाच्या कालखंडात या बाधित दाम्पत्यांच्या संपर्कात रुग्णालयातील वैधकीय अधिकारी,अधिपरिचरिका,कक्ष सेवक व इतर कर्मचारी आले असून आमच्यापासून समाजातील इतर घटकास तसेच आमचे कुटुंबियास बाधा पोहचू नये या हेतूने आमचे संस्थात्मक विलगीकरन किंवा होम क्वारेंटायीन करण्यात येण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी,स्थानिक वैधकीय अधिष्ठाता, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचेकडे केली आहे..निवेदनावर डॉ. जयकुमार नाईक,डॉ. सौ.वानोळे,डॉ. रोहिणी लोणकर,डॉ. बिरबल पवार,डॉ.पूनम चव्हाण,डॉ. गौरव पाटील,डॉ. आफषा तब्बसुम सैय्यद,डॉ. सय्यद इम्रान,डॉ. सौ.पूर्वी धर्मशी,डॉ. कैलाश राठोड परिसेविका सौ.व्ही.टी. राठोड,आधी परिचारिका सौ.रुपाली शिंदे,सविता कपाटे,कु.स्नेहल सोनवणे,विध्या ढाले यांचेसह सफाई कामगार,शिपाई, वाहन चालक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आरोग्य विभागाचे काखेत कळसा अन गावाला वळसा धोरण..!
बाधित रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक नागरिकास विलगीकरन कक्षात ठेवून त्याचे स्वाब टेस्टिंग करण्यात येते.त्यासाठी बाधित सहवासितांची शोधमोहीम राबविली जाते मात्र हुडी येथील बाधितांच्या सहवासात आलेले स्थानिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अद्यापही कोणत्याच विलगीकरनात दाखल करण्यात आलेले नाही.ते स्वतःहून विलगिकरनात दाखल होण्यास तयार असून त्यासंबंधीचे निवेदन तहसीलदार व वैधकीय अधिष्ठाता यांना देण्यात आल्यानेआरोग्य विभागाची काखेत कळसा अन गावाला वळसा अशी गत झाल्याचे दिसत आहे*.