भाजपाची ‘पॉवर’ वाढली; आता १२ राज्यांमध्ये ‘आत्मनिर्भर’ सत्ता, काँग्रेसकडे उरली ३ राज्यं…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यातील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने एकहाती सत्ता खेचून आणली आहे, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे.
या विजयासह भाजपकडे देशभरातील 12 राज्यांचे नेतृत्व असेल, तर काँग्रेसकडे फक्त 3 राज्ये उरतील.
राजस्थान, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाची विजयाकडे वाटचाल होताना दिसत आहे. विजयाची औपचारिक घोषणा झाल्यानंतर भाजपची देशातील 12 राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता असेल. दुसरीकडे, राजस्थान आणि छत्तीसगडच्या पराभवानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसकडे केवळ तीन राज्यांची सत्ता राहणार आहे.
आजच्या निकालानंतर दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार सत्तेत असणारा आम आदमी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असेल. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात सत्तेवर आहे. आजच्या विजयानंतर राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही भाजपचे कमळ फुलणार आहे.
या 12 राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीममध्येही भाजप इतर पक्षासोबत सत्तेत आहे. दुसरीकडे, काँग्रेसची सत्ता फक्त हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव होत असला तरी, काँग्रेसने तेलंगणाच्या रुपात दक्षिणेत आणखी एक राज्य काबीज केले आहे.
याशिवाय बिहार आणि झारखंडमधील सत्ताधारी आघाडीत काँग्रेसचा समावेश आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस द्रमुकचा मित्रपक्ष नक्कीच आहे, पण तो राज्य सरकारचा भाग नाही. सध्या भारतात सहा राष्ट्रीय पक्ष भाजप, काँग्रेस, बसपा, सीपीएम, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी आहेत. अरुणाचल प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील विधानसभा निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत. त्यात कोणता पक्ष बाजी मारणार, हे येणाऱ्या काळात कळेल.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!